नाशिक : महायुतीचा गेल्या महिन्यापासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली .मात्र त्यानंतर महायुती मध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. तीन वर्षांपासून निवडणूक तयारी करत असलेले भाजपचे दिनकर पाटील हे गोडसे यांच्या उमेदवारीने नाराज झाले आहे. हेमंत गोडसे यांच्याबद्दल मतदार संघात मोठी नाराजी आहे. भाजपच्या नेत्यांनी आपल्याला तयारी करायला सांगितले होते.गोडसे हे गेल्या पाच वर्षात मतदारांना भेटले नव्हते, त्यामुळे आपण यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेऊन भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवारी करण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत, अनिकेत शास्त्री यांनी मात्र गोडसे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता मतदारसंघात हेमंत गोडसे ,महाविकास आघाडी चे राजाभाऊ वाजे, वंचित आघाडीचे करणं गायकर, अपक्ष शांतिगिरी महाराज हे उमेदवार उभे असून माघारीनंतरचित्र स्पष्ट होणार आहे,
दरम्यान,मंत्री छगन भुजबळ यांनी गोडसे यांच्या उमेदवारी चे स्वागत केले आहे.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…