संपादकीय

अवयव तस्करीचा गोरखधंदा

 

अवयव दान सर्वश्रेष्ठ दान…. असे म्हटले जाते. विविध आजारांमुळे किंवा अपघातामुळे अवयव गमावलेल्या किंवा अवयव निकामी झालेल्या व्यक्तींना आपण आपले अवयव दान करून त्यांना नवीन जीवन देऊ शकतो. मागील काही वर्षांत विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अवयव दानाची चळवळ जोर धरू लागली आहे. लोकांनाही अवयव दानाचे महत्व पटल्याने स्वतःहून लोक अवयव दानासाठी पुढे येत आहेत. अवयव दानाबाबत आपल्याकडे कायदा आहे. कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती स्व इच्छिने अवयव दान करू शकतो. अर्थात ते केल्यानंतरही त्या व्यक्तीला निर्विधपणे जीवन जगता येईल अशाच अवयवांचे जिवंतपणे दान करता येते. मागील काही वर्षात मात्र जिवंत व्यक्तीच्या अवयव दानाचा धंदा बनल्याची तक्रार वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून सातत्याने होत आहे. देशात अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत आहे असाही आरोप केला जात होता. आता या आरोपाला पुष्टी देणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील एका मोठ्या प्रसिद्ध रुग्णालयात एका महिलेला फसवून तिच्या शरीरातील किडनी काढून घेण्यात आली. ज्या महिलेची किडनी काढून घेण्यात आली त्या महिलेला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन पाळले नाही म्हणून त्या महिलेने पोलिसात तक्रार केली. महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला आणि पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले. संबंधित महिलेची किडनी ज्या व्यक्तीला देण्यात आली ती व्यक्ती त्या महिलेचा पती असल्याचे भासवून कायदेपालन होत असल्याचा देखावा करण्यात आला त्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली. या प्रकरणाचा तपासानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या ट्रस्टीसह, डॉक्टर, संबंधित महिला, ज्या व्यक्तीस किडनी मिळाली ती व्यक्ती व मध्यस्थ अशा सर्वांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाच्या आणखी खोलात जाऊन पोलीस तपास करीत आहेत. पुण्यात घडलेले हे पहिले प्रकरण नसावे याआधी असे अनेक प्रकरणं घडली असतील. केवळ पुण्यातच नव्हे तर देशातील अनेक मोठ्या शहरातील प्रसिद्ध रुग्णालयात अशा प्रकारचे रॅकेट चालू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत भारत जगात अमेरिकेनंतर दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. अवयव प्रत्यारोपण करणार्‍या रुग्णालयांवर कायदे पालन करण्याची जबाबदारी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. दाता आणि रुग्ण यांच्यात होणार्‍या आर्थिक व्यवहाराची करण्याची जबाबदारी रुग्णालयावर टाकली तर अवयव प्रत्यारोपण करण्यास रुग्णालये पुढे येणार नाही त्यामुळे रुग्णांची अडचण होईल असे रुग्णालयाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे. न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच पुण्यातील घटना घडली त्यामुळे त्यामुळे अवयव दानाच्या चळवळीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे अवयव दानाच्या चळवळीला ब्रेक लागू नये ही अपेक्षा. मुळात ही चळवळ अवयव दानाची आहे. ते दान आहे. जिथे दान दिले जाते तिथे कोणत्याही पातळीवर पैशाचा व्यवहार होत नसतो. येथे तर अवयवांची तस्करी होत आहे. अवयव तस्करीचे मोठे रॅकेट राज्यात कार्यरत असून त्यात अनेक मोठे धेंडे सामील असण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे पाळेमुळे खणून काढली पाहिजे आणि दोषींना कडक शासन केले पाहिजे अन्यथा अवयव तस्करीचा हा गोरखधंदा असाच सुरू राहील.
श्याम ठाणेदार

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

17 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

17 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

17 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

17 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

17 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

18 hours ago