मोठी बातमी: धनंजय मुंडे यांचा राजीनामा

मुंबई: मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपांची राळ उठल्यानंतर अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सोपवला आहे, काल रात्री मुख्यमंत्री, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यात बैठक झाली होती, काल रात्रीच मुंडे यांचा राजीनामा लिहून घेण्यात आला होता,

काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले, हे फोटो पाहून महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त झाला, त्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, विरोधकांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा यासाठी रान पेटवले होते, कालपासून अधिवेशन सुरू झाले, पहिल्याच दिवशी विरोधक राजीनाम्याची मागणी करत होते, तर करुणा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंडे यांचा राजीनामा तयार असल्याचे बोलले होते, अंजलीदमानिया यांनी वेळोवेळी हा विषय लावून धरला होता, अखेर आजच राजीनामा द्या, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर आज अखेर मुंडे यांनी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सोपवला.

धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. तो मी स्वीकारलेला आहे. तो राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.
— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Bhagwat Udavant

Recent Posts

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

3 minutes ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

6 minutes ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

12 minutes ago

मनमाड शहरात वाहतूक कोंडी; गाडी बंद, रस्ता बंद

वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा! मनमाड : प्रतिनिधी दुष्काळी अन् पाणीटंचाई…

19 minutes ago

वीज वितरणकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट

दहमहा वीजबिलात दुप्पट, तिप्पट वाढ; ग्राहकांमध्ये संतापाची भावना निफाड : तालुका प्रतिनिधी वीज वितरण कंपनीकडून…

24 minutes ago

वारी…ज्ञानराज माउलींचे वरदान!

लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या…

35 minutes ago