काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची घणाघाती टीका
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटींचा खर्च केला. यात त्यांना यशही आले. देशाला नेतृत्व नसल्याचे सांगत मोदी यांनी खोटी आश्वासने देशाला दिली आणि फसवणूक केली. कॉग्रेस 2014 पर्यत सत्तेवर असताना देशावर 43 हजार कोटींचे कर्ज होते. मात्र आता देशावर तब्बल 1 लाख 9 हजार कोटींचे कर्ज झाले आहे. केंद्राचे महागाई, बेरोजगरी याकडे दुर्लक्ष करत असून भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपविण्याच्या मार्गावर असल्याची घणाघाती टीका कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
मेनरोड येथील कॉग्रेस कार्यलयात मंगळवारी (दि.24)
पटोले आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्याना मार्गदर्शन करत होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, माजी नगरसेवक शाहु खैरे, डो. हेमलता पाटील, आशा तडवी, बबलू खैरे, कॉग्रेस सेवा दल डॉ. वसंत ठाकुर, वत्सला खैरे, राहुल दिवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पटोले यांनी भाजपवर चौफेर हल्ला केला. ते म्हणाले की, देशाच्या सीमा सुरक्षित नाही. केद्राने महागाइ, बेरोजगारी याकडे लक्ष द्यायला हवे त्याकडे न देता संविधान संपवण्यासाठी सोयीस्कर प्रयत्न सुरु आहे. त्यासाठीच राहुल गांधी यांनी कश्मिर ते कन्याकुमारी पर्यत भारत जोडो यात्रा काढली आहे. चौता स्तंभ पत्रकारितेला म्हनत असलो तरी सध्या या स्तंभावरच मोदींनी घाव घालत गोदी मीडियाच करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कांद्यासह कापसाला भाव नाही, कारण शेतकरी संम्पला पाहिजे हा यांचा उद्देश आहे. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असताना लोकांच्या भावना दाखवत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.
डॉ. बाबासाहेबानी दिलेले सविधान संपविण्याचे काम भाजप करत असताना मात्र हा देश आणि संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी झगडत आहे. त्यांना कोट्यावधी भारतीयांचा प्रतिसाद मिळत आहे. मुळात भाजपाला पुरोगामी विचार संपावयचे असून त्या जागी त्यांचे धोरणे राबवायचे आहे. आणि गुलाम व्यवस्था प्रस्थापीत करायची असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. बाबासाहेबांना शिक्षणाला वाघीनीचे दूध म्हटले, परंतु हे शिक्षणच मिळू नये याकरिता भाजप प्रयत्नशील आहे. मुद्दामून पटसंख्येचा मुद्दा समोर आनला जातोय, कारण भाजपला शिक्षण नको, नोकरीं द्यायची नाही. उलट देशात कृत्रिम महागाइ वाढवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्या आपल्याला नक्कीच चांगले दिवस येतील याकरिता प्रामाणिकपनाने काम करत रहा. अशा सूचना त्यांनी दिल्यात.
भाजप म्हणजे जुमला पार्टी
नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप करताना भाजपा म्हणजे भाजपा जुमला पार्टी असल्याची जळजळीत टीका केली. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मुठभर लोकांचे आहेत. जेव्हा देशात कोरोना असताना केद्रातील सरकार अशा महामारीच्या प्रसंगी मध्य प्रदेश सरकार पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
………………
देशात कोरोना मोदींमुळे
सर्व जग आणि जागितक आरोग्य संघटनांनी भारताला आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याच्या सूचना देत होते. मात्र केवळ ट्रम्प यांच्यासाठी गुजरातमध्ये त्यांना पायघड्या घालण्यात आल्या. तेव्हापासूनच देशात कोरोना फोफावला. त्यामुळे देशातील कोरोनाला पंतप्रधान नरेद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केला.
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…
श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…