नाशिक

सिडकोत कोयत्याने मारहाण, वाहनांची तोडफोड

जुन्या भांडणातून टोळीयुद्धाचा पुन्हा भडका

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील संजीवनगर परिसरात पुन्हा एकदा दोन टोळींत जुना वाद चिघळल्याने मोठा हिंसाचार घडला. पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढत एका टोळीतील सदस्यांनी दुसर्‍या टोळीवर कोयते व तलवारींनी हल्ला चढवून काही जणांना गंभीर जखमी केले. यासोबतच घरासमोर पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद फैसल वाहिद शेख (वय 28, रा. संजीवनगर, अंबड, नाशिक) हे रविवारी रात्रीच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळील रस्त्यावरून पायी जात असताना, चार मोटारसायकलीवरून आलेल्या 10 ते 12 टवाळखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद फैसल यांच्या पाठीवर व कानावर गंभीर जखमा झाल्या. तसेच या टवाळखोरांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडीतदेखील दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर या हल्लेखोरांनी सिडकोतही अशाच प्रकारे धुमाकूळ घातल्याचे बोलले जाते आणि त्यानंतर त्यांनी संजीवनगरमध्ये वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली आहे.
यावेळी पादचारी मोहम्मद अमीरूल शेख यांच्यावरदेखील धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. तसेच साई रुद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे संजीवनगर परिसरात प्रचंड दहशत पसरली असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Gavkari Admin

Recent Posts

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…

17 hours ago

48 सोनोग्राफी केंद्रांची झाडाझडती

भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…

17 hours ago

बत्तीस कोटींचे यांत्रिकी झाडू पावसाळ्यात फेल

वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…

17 hours ago

मुलींनो, खंबीर व्हा..

प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…

17 hours ago

रागावर नियंत्रण हीच आत्मविकासाची पहिली पायरी

राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…

17 hours ago

हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी…

18 hours ago