मुंबई : ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले . वर्षावरून मातोश्रीकडे जाताना उद्धव ठाकरे असे बोलले आणि निघून गेले . उद्धव ठाकरे यावेळी भावुक झाल्याचे दिसून आले . त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रूप आल्याचं पाहायला मिळतंय . तिकडून काय सांगता तोंडावर सांगा , मी राजीनामा द्यायला तयार आहे , असे उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून म्हटले होते . जनतेशी तसेच बंडखोर आमदारांशी संवाद साधला . तुम्ही इकडे या आणि मला सांगा , मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही लायक नाही , मी लगेच राजीनामा देतो , असं उद्धव ठाकरे म्हणाले . त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला आजच सोडणार असल्याचं जाहीर केलं . त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले . वर्षा निवासस्थान सोडताना त्यांनी एकच वाक्य उच्चारलं , ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असे म्हणाले आणि निघून गेले .
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…