नाशिक

वर्षा निवासस्थान सोडताना मुख्यमंत्री भावुक

 

मुंबई : ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले . वर्षावरून मातोश्रीकडे जाताना उद्धव ठाकरे असे बोलले आणि निघून गेले . उद्धव ठाकरे यावेळी भावुक झाल्याचे दिसून आले . त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रूप आल्याचं पाहायला मिळतंय . तिकडून काय सांगता तोंडावर सांगा , मी राजीनामा द्यायला तयार आहे , असे उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून म्हटले होते . जनतेशी तसेच बंडखोर आमदारांशी संवाद साधला . तुम्ही इकडे या आणि मला सांगा , मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही लायक नाही , मी लगेच राजीनामा देतो , असं उद्धव ठाकरे म्हणाले . त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला आजच सोडणार असल्याचं जाहीर केलं . त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले . वर्षा निवासस्थान सोडताना त्यांनी एकच वाक्य उच्चारलं , ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असे म्हणाले आणि निघून गेले .

AddThis Website Tools
Ashvini Pande

Recent Posts

सिडकोतील कामठवाडे भागात तरुणाचा खून

सिडको : दिलीपराज सोनार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात असलेल्या अमरधाम रोड नजीक एका…

8 hours ago

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना

पंचवटी : वार्ताहर म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकर पार्क, बालकृष्णनगर, कंसारा माता चौक आणि शांतीनगर,…

8 hours ago

एकाच कुटुंबातील 5 जणांचा अपघातात मृत्यू

जयपूर : एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रेलर आणि कारची समोरासमोर…

8 hours ago

म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त दोन दिवसीय कुस्त्यांची दंगल

सिडको ः विशेष प्रतिनिधी उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या तीरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या महाकाय वटवृक्षाच्या…

8 hours ago

श्रीराम मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

सिन्नर : प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिन या कालावधीत…

8 hours ago

सोनारी दुर्घटनेतील सासू, जावयाच्या मृत्यूनंतर मुलीचाही मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी स्वत:ला ज्वलनशील पदार्थाने पेटवून घेत पत्नी आणि सासूला मिठी मारून त्यांना जीवे…

8 hours ago