मुंबई : ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले . वर्षावरून मातोश्रीकडे जाताना उद्धव ठाकरे असे बोलले आणि निघून गेले . उद्धव ठाकरे यावेळी भावुक झाल्याचे दिसून आले . त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रूप आल्याचं पाहायला मिळतंय . तिकडून काय सांगता तोंडावर सांगा , मी राजीनामा द्यायला तयार आहे , असे उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून म्हटले होते . जनतेशी तसेच बंडखोर आमदारांशी संवाद साधला . तुम्ही इकडे या आणि मला सांगा , मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही लायक नाही , मी लगेच राजीनामा देतो , असं उद्धव ठाकरे म्हणाले . त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला आजच सोडणार असल्याचं जाहीर केलं . त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले . वर्षा निवासस्थान सोडताना त्यांनी एकच वाक्य उच्चारलं , ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असे म्हणाले आणि निघून गेले .
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…