नाशिक

रानडुकरांकडून पिकांचे नुकसान, शेतकरी हैराण

वन विभागाने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी राजापूरला रास्ता रोको

येवला : प्रतिनिधी
रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले असून, वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी येवला तालुक्यातील राजापूर येथे शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निषेध केला.
दरम्यान, वन विभागाने वनविभागांतर्गत रात्रीची गस्त वाढवण्यात येईल, ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले, त्यांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन नुकसानभरपाई देण्यात येईल, कायमस्वरूपी जाळीचे तार कंपाउंड करण्यात येईल, असे आश्वासन येवला वन विभागाचे वनक्षेत्रपाल राहुल घुगे यांनी दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकर्‍यांची जंगलाशेजारी शेतजमीन असून, रानडुकरांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.
शेतकर्‍यांनी पेरणी केलेली असून, रानडुकर शेतात पेरणी केली की लगेचच रात्री उकरून खाऊन टाकत आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकर्‍यांना दरवर्षीच पेरणी केली का, पाऊसपाण्यांचा विचार न करता रात्रभर शेतात रानडुकरांचा उपद्रव कमी करण्यासाठी राखण करावे लागते. रानडुकर मोठ्या प्रमाणावर शेतातील पिकांचे नुकसान करतात. या पार्श्वभूमीवर राजापूर चौफुलीवर राजापूर, ममदापूर, सोमठाणजोश व वन विभागाच्या जंगलाशेजारी असलेल्या शेतकर्‍यांनी दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
येवला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी चोख बंदोबस्त ठेवला. येवला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंडलिक, राजापूर बीट हवालदार दीपक जगताप, पोलिसपाटील मनोज अलगट यांनी आंदोलनस्थळी सहकार्य केले. यावेळी समाधान आव्हाड, अशोक आव्हाड, एकनाथ आव्हाड, अजित आव्हाड, विजय धात्रक, सुभाष वाघ, दत्तात्रय धात्रक, दत्तू वाघ, सयाजी गुडघे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाण जोश आदी गावांतील बहुसंख्य शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, राजापूर वनपाल भाऊसाहेब माळी, ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर, राजापूर वनरक्षक गोपाल राठोड यांना शेतकर्‍यांनी निवेदन दिले. वन विभागाच्या जंगलात जाळीचे तार कुंपण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचार्‍यांनी आंदोलकांना देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

 

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

17 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

36 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago