एल्गार कष्टकरी संघटनेचा सवाल, आदिवासी पाड्यांकडेही लक्ष घालावे
नाशिक : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दिमाखात इगतपुरी तालुक्यात झाले. या महामार्गावरून हजारो वाहने दररोज सुखकर व गतिमान प्रवास करतील. मात्र, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासी, डोंगराळ, ग्रामीण व आदिवासींच्या वाड्या-पाड्यांना जोडणार्या रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार? असा सवाल एल्गार कष्टकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी
केला आहे.
एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्यांबाबत आपल्या व्यथा मांडतील, किंबहुना काहीसे वेगळे आंदोलन करतील म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यादरम्यान यंत्रणांनी नजरकैदेत ठेवल्याची माहिती संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी दिली.
नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्यातील काम व इगतपुरी ते आमणेे यादरम्यान 76 किलोमीटरचा टप्पा या महामार्गाचा लोकार्पण झाला. या सोहळ्यात समृद्धी महामार्गाच्या उभारणीपासून ते अंतिम टप्प्याच्या कामापर्यंत, समृद्धी महामार्गामुळे होणारा विकास, इकॉनॉमिक कॉरिडॉर, पर्यटन, पर्यटनस्थळांचा विकास, धार्मिकस्थळांचा विकास, औद्योगिकीकरण, दळणवळणाची गतिमानता आदी बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला.
हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारा प्रोजेक्ट आहेच. म्हणून या महामार्गाच्या कामाबद्दल शासनाचे एल्गार कष्टकरी संघटनेने कौतुक केले. मात्र, आदिवासींच्या डोंगराळ, वाड्यापाड्यांकडे जाणार्या उद्ध्वस्त रस्त्यांकडेही शासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील रस्तेही दर्जेदार व मजबूत करून आदिवासी समाजाच्या वाड्या-पाड्यांच्या विकासात, परिसराच्या विकासात भर घालावी, अशी अपेक्षाही या संघटनेने व्यक्त केली आहे.
संघटनेचे काही पदाधिकारी यांनी या रस्त्यांच्या कामाबाबत तसेच वैतरणा धरणाच्या अतिरिक्त जमिनीचा प्रश्न, जलजीवन योजनेतील त्रुटी, युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची भेट घेण्यासाठी इगतपुरीकडे प्रस्थान केले होते. मात्र, प्रशासनाने या पदाधिकार्यांना मुख्यमंत्री व मंत्रिमहोदयांपर्यंत पोहोचू दिले नाही, याची खंत वाटते.
– भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…