महाराष्ट्र

नाशिक-त्र्यंबकरोडवर धुळवड

धुळीमुळे वाहने चालविणे अवघड
नाशिक : प्रतिनिधी
पाऊस उघडल्यामुळे रस्त्यावर साचलेल्या मातीचा तसेच वाळूचा आता वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. वाहने गेल्यानंतर रस्त्यावर धुळ उठत असल्याने सद्या नाशिक-त्र्यंबक रोडवर वाहनधारक धुळीमुळे कमालीचे हैराण झाले आहेत.

शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संततधार सुरू होती. या पावसामुळे जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले होते. मात्र, आता कालपासून पाऊस उघडल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले असताना उन्हामुळे रस्ते सुकल्याने रस्त्यावर पावसामुळे वाहून आलेली माती तसेच वाळू सुकल्यामुळे त्यावरुन वाहने गेल्यावर धुळीचे लोट उठत आहेत. त्याचा परिणाम दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. डांबरी रस्त्यावरुन चालताना या धुळीमुळे दुचाकीस्वारांच्या डोळ्यात ही धुळ जात आहे. आधीच शहरातील बहूतांश भागात पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्डयांतून वाहने चालविताना कोणता खड्डा चुकवू असा प्रश्‍न दुचाकीस्वारांना पडत आहे. त्यात ही धुळवड त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्र्यंबक रोडवरील जिल्हा रुग्णालय परिसर, एबीबी सर्कल, दुध डेअरी भागात वाहने चालविणेही मुश्किल झाले आहे. विशेषत: दुचाकीस्वारांना याचा ाजस्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहने चालवावी कशी? असा प्रश्‍न या वाहनधारकांना सतावत आहे. या धुळीमुळे रस्त्याच्या कडेला बसणार्‍या विक्रेत्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 day ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 day ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago