उत्तर महाराष्ट्र

नाफेड’ चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण,कांदा खरेदी बंद

नाफेड’ चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण,कांदा खरेदी बंद

लासलगाव समीर पठाण

बाजार स्थिरीकरण योजनेतून सुरू असलेली केंद्राची नाफेड मार्फत सुरू असलेली कांदा खरेदी २.५ लाख टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याचे सांगत सदर कांदा खरेदी शनिवार दिनांक १६ जुन पासुन थांबविण्यात आल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती.नाफेड च्या कांदा खरेदीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता.मात्र,आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.त्यामुळे आज सोमवारपासून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाणार नाही त्यामुळे त्याचा परिणाम आता दरावर कसा होणार
या कडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
यातच पावसामुळे चाळीत साठवलेला कांदा हा खराब झाला आहे.त्यामुळे कांदा पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

नाफेडने या वर्षी तब्बल अडीच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते परंतु प्रत्यक्षात नाफेडकडून रडतखडत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यात आला.त्यापासून शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा झाला नाही.दर वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीनंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ होते.परंतु या वर्षी नाफेडने इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करूनही कांदा उत्पादकांना अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.एकीकडे उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने केंद्राची भुमिका सरकार विरोधी असल्याच बोललं जात आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

3 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

3 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

3 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

4 hours ago