नाशिक

भुताटकीच्या संशयातून आठ कुटुंबाचे स्थलांतर

 

इगतपुरी तालुक्यात अंधश्रद्धेने पुन्हा काढले डोके वर

 

 

इगतपुरी : प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी या आदिवासी पाड्यामध्ये राहणार्‍या आठ आदिवासींनी भुताटकीच्या संशयातून घरे मोडून इतरत्र स्थलांतर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भोरवाडी या आदिवासी पाड्यात मागील महिन्यात आजारी असलेल्या एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बालकाला भुताटकीची बाधा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा  आरोप करून संबंधित कुटुंबाने 8 कुटुंबांची झोप उडवून टाकली. यामुळे या कुटुंबात दररोजच भांडणे होऊन वाद वाढायला सुरुवात झाली होती. घोटी पोलिसांपर्यंत ही तक्रार गेल्यानंतर सर्व संबंधित व्यक्तींमधील समज गैरसमज दूर करण्यात आले होते. मात्र त्या 8 आदिवासी कुटुंबांचा ससेमिरा काही थांबलाच नाही. यामुळे रोजचीच भांडणे, वाद आणि शिवीगाळ या प्रकाराला सर्वजण कंटाळून गेले होते. अखेर हे सगळे 8 कुटुंबे घरांची मोडतोड करीत सर्व साहित्यासह स्थलांतर करीत आहेत.

भोरवाडी या आदिवासी पाड्यातील लक्ष्मण धापटे, सोमा शिद, भाऊ पादिर, सनू पादिर, गंगुबाई खडके, शांताराम खडके आणि अन्य 2 अशा 8 कुटुंबाने गाव सोडून स्थलांतर सुरु केले आहे. ग्रामीण आदिवासी भागातील अंधश्रद्धा आदिवासी कुटुंबांच्या मानगुटीवर बसली असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

3 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

3 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

3 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

3 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

3 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

3 hours ago