महाराष्ट्र

उड्डाणपुलाचे काम सुरू न करणार्‍या कंपनीला पालिकेची दुसर्‍यांदा नोटीस

निओ मेट्रोमुळे एका उड्डाणपुलाच्या कामाला फुली ?

नाशिक : प्रतिनिधी
बहुचर्चित त्रिमूर्ती व मायको सर्कल येथील दोन्ही उड्डाणपुलापैकी एका पुलाच्या कामाची आवश्यकता तपासली जात असल्याने मायको सर्कल येथील उड्डाणपुलाचे काम थांबवण्याचे आदेश आले आहेत. दरम्यान या पुलाचे बांधकाम थेट निओ मेट्रोच्या मार्गात येत असल्याने कायमस्वरुपी या प्रस्तावित उड्डानपुलाचे काम थांबवले जाणार आहे. पीबीए इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मात्र उंटवाडी उड्डाणपुलाचे काम करण्यास सध्या असहकार दर्शवल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेने या कंपनीला काम सुरू करण्यासाठी दोनदा नोटीस दिली आहे.
या उड्डाणपुलामुळे दोनशे वर्षाचे वटवृक्ष व इतर शेकडो झाडे तोडली जाणार असल्याचे समोर येताच याविरोधात नाशिक शहरात वृक्षप्रेमींनी मोठे आंदोलन केले होते. त्याची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना घ्यावी लागली होती. त्याचवेळी त्यांनी विकासासाठी झाडे तोडली जाणार नसल्याचे सांगत पुलाच्या आराखड्यात बदल करणार असल्याचे आश्‍वास दिले होते. सन 2016-17 मध्ये या पुलासाठीचा प्रस्ताव होता. त्यावेळ्चे वाहतूक धोरण कसे होते, सध्या खरोखरच हा उड्डाणपूल आवश्यक आहे का हे तपासले जाणार आहे.
या पुलाच्या मार्गात निओ मेट्रोचा मार्ग येत असल्याने उड्डाणपुलाचे काम होणे अवघड आहे. या दोन्ही उड्डाणपुलाचे काम एकाच कंपनीला मिळाले होते. आता मात्र एक उड्डाणपुलाचे काम थांबवल्याने पीबीए या कंपनीकडून दोन्ही उड्डानपुलाचे कामे देण्याची मागणी केली जात आहे. ज्यावेळी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यावेळी मायको सर्कल व उंटवाडी असे दोन्ही प्रत्येकी 120 कोटींचे एकूण 240 कोटीचे उड्डाणपूल बांधण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र आता एका उड्डाणपुलाचे काम रद्द होत असल्याने ही कंपनी काम करण्यास नाटक करत असल्याचे चित्र आहे. अद्याप या कंपनीकडून त्रिमूर्ती चौक ते दिव्या शेड या उड्डाणपुलाच्या कामासंबंधी कोणतेही डिझाइन, प्लॅन सादर केलेला नाही.

पालकमंत्र्यांना नको होता उड्डाणपूल
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पालिकेत बैठक घेत कामाचा आढावा घेतला असता यावेळी त्यांनी प्रस्तावित उड्डानपुलाच्या कामाची व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या. विशेष यापूर्वी ना. भुजबळ यांनी आवाश्यकता नसेल तर उड्डाणपूल कशाला असे म्हटले होते. दरम्यान त्या पुलाच्या कामात तब्बल 574 वृक्ष येत होती.

उड्डाणपुलावरुन राजकारण जोरात
या उड्डानपुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी वारंवार केला होता. परंतु त्यांच्या या आरोपाची दखल खुद्द त्यांचाच पक्ष घेत नसल्याचे चित्र होते. तरीही स्थायीच्या सभेत शहाणे यांच्याकडून कोणासाठी उड्डाणपूल केला जातोय असा प्रश्‍न वारंवार उपस्थित केला जात होता.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

7 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

8 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

8 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

8 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

8 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

8 hours ago