काश्यपी धरणात बुडून चौघांचा मृत्यू

काश्यपी धरणात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक: प्रतिनिधी

काश्यपी धरणात बुडून पती-पत्नी सह दोघा भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. यात पत्नी ही सहा ते सात महिन्याची गर्भवती होती.

हरसूल हद्दीत असलेल्या काश्यपी धरण परिसरात पर्यटनासाठी सचिन कैलास ठोंबरे, वय अंदाजे 30 वर्षे, सध्या राहणार मखमलाबाद, मूळ राहणार, पिंपरणे, ता. संगमनेर, रोहिणी सचिन ठोंबरे, वय  25 वर्षे आणि घरा शेजारी राहणारे केतन अनिल पवार, वय 16 वर्षे, रा. मखमलाबाद,  कौशल अनिल पवार, वय 14 वर्षे, हे गेले होते. अंघोळीसाठी सर्व जण पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण   बुडाले. पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. मृत रोहिणी ही सहा ते सात महिन्याची गर्भवती होती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *