महाराष्ट्र

लुटारू महिलांची टोळी धुळ्यातून जेरबंद

नाशिक : वार्ताहर
एकट्या वयस्कर व महिला प्रवाशांना लक्ष्य करुन त्यांचे सोन्याचे दागिने लांबविणार्‍या तीन महिलांच्या टोळीला मुंबई नाका पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दमण येथील मंगल माधवराव क्षीरसागर या नाशिकला बहिणीला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या द्वारका येथून रिक्षामधून येत असताना रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या 3 महिलांशी संगनमत करून क्षीरसागर यांच्या बॅगेतील एकूण 3 लाख 13 हजार 250 रुपयेे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले होते. त्यांना पाथर्डीफाटा येथे न सोडता राणेनगर येथेच उतरून दिले होते. दागिने लंपास झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास केला असता यात रिक्षाचालक सहभागी असल्याने त्यांनी बड्डा उर्फ अनिल करमसिंग देंगे रा. कॅन्टोमेन्ट, देवळाली कॅम्प, नाशिक रोड यास ताब्यात घेतले होते. त्याने या महिलांबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने धुळे येथे जात शीतल गोकुळ कसबे उर्फ कासोदे (रा. एकता नगर, देवपूर धुळे) व अनिता विजय समाणे रा. हरीविठ्ठल नगर, जळगांव) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीतील साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक के. टी. गेंदळे, पोलीस हवालदार रोहिदास सोनार, पोलीस शिपाई आप्पा पानवळ, पोलीस शिपाई समीर शेख, महिला पोलीस नाईक योगिता फरसाळे यांनी ही कामगिरी केली.

हा ऐवज हस्तगत
4 ग्रँम वजनाचे डोरले, 4 ग्रँम वजनाचे मंगळसूत्र 26 हजार 500 रु. किंमतीची सोन्याची चेन, 11 हजार 750 रु. किंमतीचेे 2 टॉप्स, 9 हजार 790 रु. किंमतीचे 1 सोन्याची अंगठी, 5 हजार240 रू. किंमतीचे 1 सोन्याचे पेंडट असा मुद्देमाल या महिलांकडून पोलिसांनी हस्तगत केला. या महिलांवर यापूर्वी मुकुंदवाडी पोलिस.स्टेशनसह औरंगाबाद, अमळनेर सिटी पो.स्टे. जळगांव व देवपूर पो.स्टे., धुळे येथे चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago