आपण सर्वजण घरामधील मंदिरात, तुळशीजवळ दिवा लावतो, कारण दिवा लावल्याने तन व मन प्रसन्न होते. भक्ती बरोबर शक्तीही मिळते, तर ही शक्ती म्हणजे त्या दिव्यामधून येणारा सुगंध.. आपणास माहीत असेल की त्या सुगंधाने आपल्याला निरोगीसुद्धा राहता येऊ शकते.
दिवा कशाचा लावला तर त्याने वातावरण शुद्ध होते व आरोग्य कसे चांगले होते किंवा आजारपणात ते कसे फलदायी ठरतात हे पाहूया. दिवा छोटा व मातीचा असणे आवश्यक.
शुद्ध तुपाच्या दिव्यात एक कापूर वडी व एक लवंग टाकल्यास, सतत होणारी सर्दी व डोकेदुखी बरी होण्यास मदत होते. दिवसातून केवळ एकवेळेस.
शुद्ध तुपाच्या दिव्यात एक कापूर व एक काळेमिरी टाकल्यास, मानसिक आजार, हातापायात येणारी सूज कमी होण्यास मदत होते. मोहरीच्या तेलाच्या दिव्यात हिंग व लवंग टाकल्यास, अंगात होणारी जळजळ, ऍसिडिटी, मळमळ, डोकं जड होणे, जुलाब होणे हे विकार थांबण्यास मदत होते.
मोगर्याचे तेला(चमेली तेल) मध्ये दोन थेंब दुधाचे टाकल्यास, सतत होणारी बेचैनी, अंगदुखी, मणक्याचा त्रास, मान अवघडणे हे त्रास बरे होण्यास मदत होते.
सूर्यफुलाच्या तेलाच्या दिव्यात एक कडुनिंबाचे एक पान टाकल्यास कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. शुद्ध तुपाच्या दिव्यात भीमसेन कापूर व ओवा टाकल्यास हवेतील बारीक कीटक जे दिसत नाहीत ते राहत नाही व ऑक्सिजनचे प्रमाण सामान्यत: वाढण्यास मदत होते.
हे ही वाचा :
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…