format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 1; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 12582912;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 152.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 31;
रस्त्यांवर पाणीच पाणी, दिवसभरात 42.1 मिमी पाऊस
नाशिक : प्रतिनिधी
शहर आणि परिसरात काल (दि. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधारेमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. तीन तासांत 28.7 मिमी. तर दिवसभरात 42.1 मिलिमीटर पाऊस झाला. आजपासून शाळा सुरू होणार असल्याने काल शालेय साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे अचानक आलेल्या पावसामुळे चांगलेच हाल झाले.
मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर काल पहिल्यांदाच या हंगामातील जोरदार पाऊस झाला. दुपारपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारी साडेचारच्या सुमाराला पावसाने प्रारंभ केला. साडेपाच वाजेपर्यंत धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहिले.
मेनरोड, कानडे मारुती लेन, पिंपळपार चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. पंचवटी, कॅनडा कॉर्नर, म्हसरूळ या भागांत पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने या पाण्यातून वाहने काढताना नागरिकांना तारेवरील कसरत करावी लागली. शहरात काल एकाच तासात
13.4 मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले. तसेच भुयारी गटारीचे पाणीही रस्त्यावर आले. ठिकठिकाणी चेंबर तुंबल्यामुळे पाण्याचे तळे साचले होते.
नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे काल शहरात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी मेनरोडला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वह्या, गणवेश, बूट, शालेय साहित्य खरेदीची दुकानेही मोठ्या प्रमाणात थाटलेली होती. मात्र, अचानक सायंकाळी पाऊस आल्याने शहराच्या विविध भागांतून शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक नागरिक दुकानांमध्येच अडकून पडले. तासभर सुरू असलेल्या पावसामुळे दुकानदारांचेही हाल झाले. रस्त्यावर दुकाने थाटून बसलेल्या विक्रेत्यांना पावसापासून साहित्य वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. मेनरोड भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याचदरम्यान पावसामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. पावसामुळे रिक्षाचालकांनीही नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून नेहमीप्रमाणे गैरफायदा घेतला. यंदा शैक्षणिक साहित्याच्या दरात तीन ते चार टक्के वाढ झाल्यामुळे पालकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…