नाशिक

शहरात पावसाची संततधार

 

नाशिक : प्रतिनिधी

शहरात  दिवसभर पावसाची संततधार  सुरू होती.   मंगळवारी पावसाचा  जोर ओसरला होता. मात्र काल सकाळपासून शहरात पावसाची रिपरिप  सुरू होती. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर गोदावरीचा पुर अद्याप ओसरला नाही.

शहरासह जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हयातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे नद्या, नाले, तळे, ओढे ओसंडून वाहत आहेत. धरण क्षेत्राच्या पानलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठयात वाढ झाली आहेत.  नद्यांना पुर आल्याने जिल्हयातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे . तर अनेकांनी पुरात आपला जीव गमवावा लागला आहे.    अवघ्या सहा दिवसात  झालेल्या जोरदार पावसामुळे  जुन महिन्याचा बॅकलॉक पावसाने भरून काढला आहे. तसेच 11 ते 14 जुलै या कालावधीत जिल्हयाला रेड अलर्ट  देण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार  शहरासह जिल्ह्यात  पावसाची दिवसभर  संततधार  सुरू होती.  तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुसळधार  पाऊस सुरू होता. मुसळधार  पावसामुळे जन जीवन विस्कळीत  झाले आहे. तर भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यासमोर  समोर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

 

पर्यटनाला बहर

जिल्ह्यातील  होत असलेल्या पावसामुळे पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. मात्र  धबधबे , नदी लगत जात पर्यटकांकडून  करण्यात येत असलेल्या हुल्लबाजीमुळे पोलिस प्रशासनासमोर पर्यटकांना रोखण्याचे आवाहन निर्माण झाले आहे.

 

महापुर पाहण्यासाठी गर्दी

गोदावरीला आलेला महापुर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तर होळकर पुलावर वाहनधारकांकडून वाहने थांबवत पुर पाहण्यात येत आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

 

दुर्घटनांचे सत्र

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना होत आहेत .अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. तर काही ठिकाणी   घरात पाणी शिरून घरांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते खचत असल्याने अपघात होत आहेत.

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago