उत्तर महाराष्ट्र

नाफेड’ चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण,कांदा खरेदी बंद

नाफेड’ चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण,कांदा खरेदी बंद

लासलगाव समीर पठाण

बाजार स्थिरीकरण योजनेतून सुरू असलेली केंद्राची नाफेड मार्फत सुरू असलेली कांदा खरेदी २.५ लाख टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याचे सांगत सदर कांदा खरेदी शनिवार दिनांक १६ जुन पासुन थांबविण्यात आल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती.नाफेड च्या कांदा खरेदीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता.मात्र,आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.त्यामुळे आज सोमवारपासून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाणार नाही त्यामुळे त्याचा परिणाम आता दरावर कसा होणार
या कडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
यातच पावसामुळे चाळीत साठवलेला कांदा हा खराब झाला आहे.त्यामुळे कांदा पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

नाफेडने या वर्षी तब्बल अडीच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते परंतु प्रत्यक्षात नाफेडकडून रडतखडत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यात आला.त्यापासून शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा झाला नाही.दर वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीनंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ होते.परंतु या वर्षी नाफेडने इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करूनही कांदा उत्पादकांना अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.एकीकडे उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने केंद्राची भुमिका सरकार विरोधी असल्याच बोललं जात आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 day ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 day ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago