महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

 


नाशिज: प्रतिनिधी  भोंग्याविरोधी आंदोलनामुळे   वातावरण चांगलेच तापले असून भद्रकाली परिसरात अजान सुरू होताच हनुमान चाळीस लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सातपूरला सहा ते सात जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस रस्त्यावर उतरले असल्याने मनसे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत.

 

भद्रकाली परिसरात झालेल्या आंदोलनात महिला पदाधिकार्यांचा समवेश  होता. सकाळच्या आजानवेळी काही ठिकाणी भोंग्याविना अजान झाली. पहाटेपासूनच शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील विविध मशिदी, मंदिर सह संवेदनशील भागामध्ये पोलिसांचा पहाटेपासून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भद्रकाली परिसरात माजी नगरसेवक सुजता ढेरे सह मनसेच्या महिलांनी दूध बाजार परिसरात मशिदी समोर श्रीरामाच्या घोषणा दिल्या यानंतर सदर महिलांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे सातपूर मध्ये एका मंदिरांमध्ये पुण्यातील सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरात पहाटे चार पासूनच पोलिसच बंदोबस्त तैनात आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

17 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

36 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

43 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

52 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago