महाराष्ट्र

मनसेकडून पालिका निवडणुकीची रणनिती ?



अमित ठाकरेंची बंद दाराआड पदाधिकाऱ्यांशी चर्चा


नाशिक : गोरख काळे

एकेकाळी नाशिक शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळ्खले जायचे.  मात्र पक्ष अडचणीत असताना एक-एक करत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठ्ही दिली.  सध्या पक्षाची स्थिती कमकूवत झाली असली तरी मनसे प्रमुख राज ठाकरे(RAJ THACKERAY) यांच्याकडून करिश्मा होण्याचा आशावाद मनसैनिकांना आहे. 

दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पुत्र व मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (AMIT THACKERAY) यांनी नाशिककडे लक्ष केंद्रीत केले.  मंगळ्वारी (दि.28) त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागातील पदाधिकाऱ्याशी बंद बंद दाराआड चर्चा केली.

हेही वाचा : राज ठाकरे लीलावतीत आज दाखल होणार

पक्षाला गत वैभव मिळवून देण्याकरिता मनसे युवा नेते अमित ठाकरे(AMIT THACKERAY) यांच्या समोर आव्हान असणार आहे.  पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांना नाशिककडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.  मंगळ्वारी त्यांनी शहरातील राजगड कार्यालयावर सहाही प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी बंददाराआड चर्चा करत, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिल्याची चर्चा आहे.  बैठकीत केवळ संबंधित प्रभागातील पदाधिकार्यांनाचा प्रवेश होता.

 

सध्या नाशिक महापालिकेत प्रशासकर राजवट असल्याने ऑक्टोबर मध्ये पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.  तत्पूर्वी शहरातील पक्ष संघटनेत सुरु काय आहे, याची अमीत ठाकरे यांनी माहिती जाणून घेतल्याचे समजते आहे.  दरम्यान नाशिक हे राज ठाकरे(RAJ THACKERAY)यांचे आवडते शहर राहिले आहे.  परंतू सप्टेंबर 2021 नंतर ते शहराकडे आलेले नाहीत.  2012 साली मनसेने पालिकेत सत्ता मिळवली होती.  परंतु अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे मोठा फटका पक्षाला बसला. आणि 2017 मधील पालिका निवडणुकीत सपाटून मार खावा लागला.

 

सध्यास्थित राजकीय स्थिती पाहून आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षाला पुन्हा ताकद दाखवण्याची संधी असणार आहे.  अमित ठाकरे यांनेी मंगळ्वारी शहरातील काही प्रभागातील पदाधिकाऱ्यांसमवेत बंद दाराआड चर्चा केली.  यात आगामी पालिका निवडणुकीपूर्वी पक्षाची काय तयारी असावी, पक्ष संघटनेत कशा पद्धतीने काम करायला हवे प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यत कसे जाता येइल.  याविषयी सूचना केल्यात.  शिवाय पदाधिकाऱ्यांचे काय मत आहे.  हे देखील जाणून घेतले.

बुधवारी उर्वरीत प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.  दरम्यान राज्यातील सत्ता उलथापालथमुळे नागरिकांमध्ये राजकारण्याविषयी रोष असल्याचे दिसत आहे. या सर्व घडामोडीमध्ये मनसे पुन्हा शहरातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावू शकते.  याकरिता मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिककडे लक्ष क्ंद्रीत केल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा : मनसे नेते बाळा नांदगांवकर आज नाशिक दौऱ्यावर


पक्ष संघटनेत बदलाचे संकते

दरम्यान नाशिक शहरातील मनसेच्या पक्षसंघटनेत बदल होण्याचे संकते अमित ठाकरे यांनी दिले आहे.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खांदेपालट झाल्यास त्याचा पक्षाला कितपत उपयोग होइल.  हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.  काही दिवसांपासून पक्ष संघटनेत समन्वय नसल्याची जोरदार चर्चा मनसैनिकांमध्येच आहे.  असेच सुरु राहिले तर याचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे.
….
नाशकात ठाकरे विरुध्द ठाकरे

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकरोड येथे जाहीर मेळावा घेतला होता. त्यानंतर आता मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिककडे लक्ष घातल्याचे दिसत आहे. परिणामी आगामी महापालिका निवडणुकीत नाशिककरांसमोर आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा संघर्ष पहावयास मिळ्ण्याची शक्यता आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

4 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

4 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

5 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

5 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

5 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

5 hours ago