नाशिक

थकबाकी वसुलीसाठी गल्लीबोळात जाणार रिक्षा

 

गुरवारपासून मोहिमेला सुरवात अद्याप 41 कोटीचे उदिष्ट

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या उत्पन्नात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली महत्वाचा स्त्रोत आहे. मात्र करसंकलन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अपेक्षित थकबाकी वसुली करताना दमछाक होत आहे. दरम्यान आयुक्तांनी 31 मार्चपर्यत घरपट्टीचे 175 कोटी व पाणीपट्टीचे 75 कोटी थकबाकी वसुलीचे उदिष्ट दिले आहे. थकबाकीदारांनी त्यांचा थकीत कर भरावा यासाठी नाशिकच्या सहाही विभागातील गल्यांमध्ये रिक्षा चालवली जाणार असून थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाणार आहे.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे तीस दिवस शिल्लक असून थकबाकी वसुलीसाठी करसंकलन विभागाने पूर्ण जोर लावला आहे. थकबाकीदारांना कर भरता यावा यासाठी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही विभागीय व उपविभागीय कार्यालय सुरु ठेवले जाणार आहे. मागील ऑक्टोंबर महिन्यापासून थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाओ मोहीम घेण्यात आली. तसेच मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा धाडणे, अंतिम सूचनापत्र पाठवणे व मालमत्ता जप्तीचे वारंट जारी करणे आदी कारवाई सुरु आहे. आतापर्यंत 175 पैकी 159 कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. अद्याप 16 कोटींची वसुली शिल्लक आहे. तर पाणीपट्टि थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे. 75 कोटींच्या उदिष्टापैकी 50 कोटी 64 लाखाची वसुली झाली आहे. उर्वरीत उदिष्ट पूर्ण करण्यासाठी येत्या गुरुवारपासून पुन्हा ढोल बजाओ मोहीम सुरु केली जाणार आहे. तसेच थकबाकीदारांनी महापालिकेला सहकार्यकरुन कर भरावा अन्यथा कारवाई केली जाईल हा संदेश देण्यासाठी प्रत्येक प्रभागात एक रिक्षा फिरवली जाणार आहे. वरील संदेश असलेली ऑडिओ क्लिप उदघोषकावर वाजवली जाईल. दिवसाला एक रिक्षा शंभर किलोमीटर फिरणार आहे. तीस दिवस शहरातील गल्लीबोळात ही रिक्षा फिरणार आहे. महापालिका करसंकलन विभाग थकित मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी ढोल बजाओ या मोहीम सोबतच नागरिकांनी थकबाकी अदा करुन सहकार्य करावे हा संदेश देण्यासाठी गल्लीबोळात रिक्षा फिरवणार आहे. गुरुवारपासून (दि.2) शहरातील सहाही विभागात प्रत्येकी एक रिक्षा गल्लीबोळात फिरवली जाणार आहे. पुढिल 31 मार्चपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. मालमत्ता व पाणीपट्टी असे एकूण 41 कोटींची थकबाकी वसुलीचे करसंकलन विभागाचे उदिष्ट आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

17 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

30 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

36 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

56 minutes ago