फरार आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिकरोड : प्रतिनिधी
अमरावती येथून खून करून पसार झालेल्या संशयिताला नाशिकरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सुरज सुभाष मारवे (वय 29 रा.सुदर्शन नगर फैजलपुरा अमरावती) असे ताब्यात घेतलेल्या सशयिताचे नाव आहे. मारवे याने चार महिन्यापूर्वी अमरावती मध्ये खून करून फरार झाला होता. मात्र त्यास नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले.
याबाबत माहिती अशी कीं, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की अमरावती शहरातील फैजलपुरा पोलीस ठाण्यातील 302 मधील मुख्य आरोपी सुरज सुभाष मारवे वय 29 राहणार सुदर्शन नगर फैजलपुरा अमरावती हा फरार असल्याचे समजले त्यानंतर पाटील व त्यांचे सहकारी गस्त घालित असताना रेल्वे स्टेशन परिसरात संशयित मारवे हा असल्याचे समजले त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो खुनातील आरोपी असून गेल्या चार महिन्यापासून तो फरार होता.
संशयित मारवे यास अटक करण्यात आली असून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी यासंदर्भात अमरावती पोलीस स्टेशनला संपर्क साधून या आरोपी बद्दल माहिती दिली. लवकरच या आरोपीला अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश नायदे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे तसेच विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे वसंत काकड अविनाश देवरे मनोहर शिंदे सोमनाथ जाधव राकेश बोडके केतन कोकाटे आदींचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…