भात नागली वरई उडीद पिकांचे अतोनात नुकसान
ननाशी : वार्ताहर
ननाशी परिसरात आज अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ननाशी परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे.रब्बी पिकांना थोड्याफार प्रमाणात या पावसाचा फायदा होईल मात्र भात नागली वरई उडीद ही पिके सोंगून मळणीसाठी रचून ठेवली होती त्यात पाणी गेल्याने या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे.रचून ठेवलेले धान्य काळे पडण्याची भीती आहे
मागील अवकाळीने नुकसान केलेच परंतु आता धान्य तयार झाल्यानंतर झालेले नुकसान यापेक्षा मोठे आहे.मागील अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही व आता पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजा करत आहे
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…