भात नागली वरई उडीद पिकांचे अतोनात नुकसान
ननाशी : वार्ताहर
ननाशी परिसरात आज अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ननाशी परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे.रब्बी पिकांना थोड्याफार प्रमाणात या पावसाचा फायदा होईल मात्र भात नागली वरई उडीद ही पिके सोंगून मळणीसाठी रचून ठेवली होती त्यात पाणी गेल्याने या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे.रचून ठेवलेले धान्य काळे पडण्याची भीती आहे
मागील अवकाळीने नुकसान केलेच परंतु आता धान्य तयार झाल्यानंतर झालेले नुकसान यापेक्षा मोठे आहे.मागील अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही व आता पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजा करत आहे
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…