भात नागली वरई उडीद पिकांचे अतोनात नुकसान
ननाशी : वार्ताहर
ननाशी परिसरात आज अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ननाशी परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे.रब्बी पिकांना थोड्याफार प्रमाणात या पावसाचा फायदा होईल मात्र भात नागली वरई उडीद ही पिके सोंगून मळणीसाठी रचून ठेवली होती त्यात पाणी गेल्याने या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे.रचून ठेवलेले धान्य काळे पडण्याची भीती आहे
मागील अवकाळीने नुकसान केलेच परंतु आता धान्य तयार झाल्यानंतर झालेले नुकसान यापेक्षा मोठे आहे.मागील अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही व आता पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजा करत आहे
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…