भात नागली वरई उडीद पिकांचे अतोनात नुकसान
ननाशी : वार्ताहर
ननाशी परिसरात आज अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ननाशी परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे.रब्बी पिकांना थोड्याफार प्रमाणात या पावसाचा फायदा होईल मात्र भात नागली वरई उडीद ही पिके सोंगून मळणीसाठी रचून ठेवली होती त्यात पाणी गेल्याने या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे.रचून ठेवलेले धान्य काळे पडण्याची भीती आहे
मागील अवकाळीने नुकसान केलेच परंतु आता धान्य तयार झाल्यानंतर झालेले नुकसान यापेक्षा मोठे आहे.मागील अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही व आता पुन्हा शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजा करत आहे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…