नाशिक

निवृत्तीनाथ मंदिर कार्यक्रमाचे नगराध्यक्षांनाच निमंत्रण नाही

स्थानिकांना सामावून घेत नसल्याने नाराजी
नाशिक/ त्र्यंबकेश्‍वर : प्रतिनिधी
देशविदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले वारकरी संप्रदायचे आद्य संस्थापक संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराच्या विश्‍वस्तांनी मंदिर संस्थानचे बोध चिन्ह प्रकाशन सोहळ्याला त्र्यंबकेश्‍वरचे नगराध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांना कार्यक्रमात सहभागी करुन न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
समाजमाध्यमांवर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संस्थानचे अध्यक्ष गाढवे यांनी अनवधनाने ही चूक झाल्याबद्दल नगराध्यक्षांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केल्याने तूर्तास या प्रकरणावर पडदा पडला आहे. तथापि, निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टने यापुढील काळात कार्यक्रमाचे नियोजन करताना समन्वयकाची जबाबदारी सर्वांशी समन्वय साधू शकेल, अशाच व्यक्तींवर दिल्यास अध्यक्षांनाच जनतेच्या प्रश्‍नांना तोंड देण्याची वेळ येणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत
आहे.
मागील  आठवडयात संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे बोध चिन्ह तसेच समाजमाध्यमाचा प्रकाशन सोहळा नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे झाला.
या कार्यक्रमासाठी नित्यसेवेकरी भक्त तसेच गावचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष,नगरसेवक आणि जेष्ठ नागरिक यांना निमंत्रण देखील पाठवले नाही. नगराध्यक्षांनी पालिका सभागृहात झालेल्या निर्मळवारी बैठकीच्या प्रसंगी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष यांनी चूक झाल्याचे मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या आठवड्यात संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव होत आहे. गावगाड्याला सोबत घेतले तर यात्रा नियोजन  सुरळीत पार पडता येईल, याकडे विश्‍वस्त मंडळाने लक्ष देण्याची आवश्यकता असून, झालेल्या प्रकाराबाबत त्र्यंबकचे नगराध्यक्ष यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक येथील कार्यक्रमाच्या निमंत्रणाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्याकडून निमंत्रणे देण्याचे राहून गेले असतील, यापुढील काळात काळजी घेतली जाईल.
-नीलेश गाढवे, (संस्थान अध्यक्ष)
संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर त्र्यंबकेश्‍वर येथे आहे.शेकडो वर्षापासून येथे उत्सव,यात्रा यासह विविध कार्यक्रम होत असतात.मात्र अशा प्रकारे दुसर्‍या ठिकाणी कार्यक्रम करून ग्रामस्थांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. यासंदर्भात संस्थानच्या अध्यक्षांना आपण विचारणाही केली होती. त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तथापि, यापुढे असे होणार नाही अशी अपेक्षा आहे.
-पुरुषोत्तम लोहगावकर,नगराध्यक्ष
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

7 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago