नाशिक

समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट; शहर पोलिसांचा कारवाईचा इशारा

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
राज्यात अहमदनगर, संगमनेर, कोल्हापूर येथे घडलेल्या तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस अलर्ट झाले आहेत. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिककरांनी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, ट्विटर इत्यादी सारख्या समाज माध्यमांवरून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या, अवमानकारक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा संदेश प्रसारित (व्हायरल) करू नयेत असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
असे केल्यास त्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सामाजिक सलोख्याला बाधा येईल किंवा कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकुर समाजमाध्यमांवर प्रसारित करू नये. तसे आढळुन आल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दानिश मन्सुरी यांनी केले आहे.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago