खाद्यतेल आणखी महागणार!
सध्या भारताची खाद्य तेलाची गरज 230 लाख टन्स एवढी आहे . त्यापैकी भारत 130 ते 150 लाख टन्स तेल आयात करतो . त्यापैकी 70 टक्के तेल पामतेल आयात होते . या पामतेलात 60 टक्के वाटा इंडोनेशिया देशाचा व उर्वरित 40 टक्के मलेशिया देशाकडून आयात होतो . सध्या आलेल्या बातम्यांनुसार इंडोनेशिया देशात पाम तेलाची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे . त्यांनी निर्यातीवर बंदी घातलेली आहे . त्याचा परिणाम भारतावर होणार आहे . मध्यंतरी भारतात खाद्य तेलाचे भाव वाढले होते . आता ते परत वाढू शकतील ही शक्यता आहे . भारतीय खाद्य तेल संघाने सरकारला या भाववाढीबद्दल काही सूचना केल्या होत्या पण अजून सरकारने यावर विचार केला नाही . असे कळते .भारतात खाद्य तेल निर्मितीचे काही मार्ग काढून त्यावर विचार करावा लागेल . अर्थात युक्रेन व रशिया युद्ध किती काळ राहणार व त्याचे परिणाम जगावर कित्ती वेळ होणार हे आजतरी कोणी निश्चित पणे सांगू शकत नाही अगोदरच डिझेल व पेट्रोल या वाढीमुळे अनेक वस्तूंच्या किमती वाढत चालल्या आहेत . त्यात आता पाम तेलाची म्हणजेच खाद्य तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
– शांताराम वाघ पुणे

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

1 day ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

1 day ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

1 day ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

1 day ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

1 day ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

1 day ago