मनाची मलिनता घालविण्यासाठी सूर्योपासना
मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश मनात येऊन मन अस्थिर होते. तेव्हा त्या मनाला स्थिर करून दुःखमुक्त करायचे असेल तर प्रातःकाळी उठून मनाने सूर्यस्नान करावे. शुभचिंतन करावे. सूर्यस्नान केल्यास मन प्रसन्न होण्यास मदत होते. सूर्याच्या कोवळ्या उन्हात 10 मिनिटे तरी निर्विकार मन करून बसावे. शुभ कल्पना कराव्यात. अरुणोदयाची लाली पाहून सूर्य आगमनाची प्रतीक्षा करावी. सूर्यस्नान, सूर्यनमस्कार मनाला ताजेतवाने करतात. सूर्याची तेजस्वी किरणे अंगावर येतात. तेव्हा चैतन्याच्या लहरी मनात शिरतात. पहाटेची अमृतवलयं आणि त्यात सूर्याची किरणं यांनी मन प्रफुल्लित होत असते. म्हणूनच प्रभू रामचंद्रापासून अनेकांनी सूर्योपासना केली आहे. मनाची देवता चंद्र आहे, तर सूर्याची देवता बुद्धी. मन आणि बुद्धी या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मन, बुद्धी आणि आत्मा या त्रिवेणीचा खेळ शरीरावर परिणाम करतो, म्हणून मनाला सुंदर विचार करण्याची सवय लावा. ती शक्ती बुद्धीकडून मिळते. बुद्धीला शक्ती आत्मा देते आणि आत्मा परमात्मा बनण्यासाठी मनाची स्थिती महत्वाची असते.
मनाची मलिनता घालविण्यासाठी सूर्योपासना करावी. सूर्याची तेजोमयी किरणे मनाचे प्रतिबिंब बदलवतात. त्या किरणांनी मनाची मनाची गती बदलते. त्यानुसार त्यातील दूरदृष्टी ठरते. ‘मन’ ही देवता प्रसन्न ठेवायची असेल तर श्रध्दायुक्त अंतःकरणाने सूर्यस्नान करा. पूर्वकालापासून ऋषीमुनी, देवी-देवता यांनी सूर्याची स्तुती केली आहे. पांडवांना ‘अक्षयपात्र’ सूर्याने दिले होते. सूर्याची शक्ती मनाला आरोग्य प्रदान करून देते. वेदकालापासून त्याची उपासना केली जाते. मनुष्य जीवनात सूर्य आरोग्य व चंद्र संपत्ती देत असतो. मंगलाचरण करण्यासाठी कायिक, वाचिक, मानसिक ताप घालविण्यासाठी सूर्यसंध्या करा. मनाला चांगले संस्कार देण्यासाठी
सूर्योपासना करणे हाही महत्वाचा भाग आहे. प्रवृत्ती-निवृत्ती मिश्रित भावना ठेवण्यासाठी मनुष्याच्या इच्छापूर्तीसाठी सूर्याचे अनुष्ठान करा. सदगुणांनी युक्त होऊन शुद्ध भावांनी ‘ओंम सूर्याय नमः’ म्हणून 12 वेळा जप करा. आपल्या मनोवृत्तीत बदल होईल. दुष्ट प्रवृत्तीपासून दूर जाऊन मनात सदभाव तयार होईल. मन उत्तमोत्तम विचार करेल.

 

– डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
संत साहित्याचे अभ्यासक व अध्यक्ष सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन , महाराष्ट्र.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

17 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

17 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

17 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

17 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

17 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

17 hours ago