पळाशी : नांदगाव-येवला रस्त्यावर तांदूळवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि. 18) येवला येथून नांदगावकडे जाणार्या चारचाकी पिकअप (एमएच 15, जेसी 2349) व नांदगावकडून भौरीच्या दिशेने जाणार्या दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, पिकअप रस्त्यावर उलटला. अपघातात भौरी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख आप्पासाहेब खंडू भिलोरे (वय 55) यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. अपघाताची माहिती नांदगाव पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघातात मृत्यू झालेले आप्पासाहेब भिलोरे हे भौरी (ता. नांदगाव) येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख, तसेच प्रगतिशील शेतकरी होते.
कॉलेजच्या रंगीत दिवसांची स्टाइल डायरी तरुणींनी कॉलेज कॅम्पसचा लूक सहज, स्टायलिश आणि व्यक्तिमत्त्वसंपन्न ठेवायचा असेल,…
पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो. कुणाला तो बालपणात घेऊन जातो, कुणाला कॉलेजवयीन…
ष्टीच्या आरंभापासूनच मानवाच्या कल्पनाशक्तीला गोंधळात टाकणारे, विस्मयकारी आणि अनंत अशा अंतराळाचे गूढ अजूनही वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा…
निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे,…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी संततधारेमुळे नाशिकरोड व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाच ते सहा…
एअरपोर्ट शैलीतील आसनव्यवस्था; प्रतीक्षालयाला नवे रूप नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी भुसावळ विभाग, मध्य रेल्वे यांनी…