महाराष्ट्र

पावसाचे जोरदार कमबॅक

नाशिक : अश्विनी पांडे
तब्बल दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. दुपारपर्यंत कडक उन्हाची अनुभूती घेतलेल्या नाशिककरांची सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची, वाहनधारकांची झाली. ठिकठिकाणी पावसाचे तळे साचले. महापालिकेच्या राजीव गांधी भवनजवळही मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
अचानक झालेल्या पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे गोदावरीला पूरही आला होता. मात्र गेल्या काही दिवासापासून शहरात पावसाची उघडडीप सुरू होती. ऐन पावसाळ्यात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक उन्हाच्या झळांनी हैरान झाले होते. मात्र काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या झळा सोसणार्‍या नाशिककरांना दिलासा मिळाला.

 

गेल्या काही दिवसात वातावणात होणार्‍या सततच्या बदलामुळे मात्र आरोग्याच्या समस्येत चांगलीच वाढ झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. शहरात हिव तापाने आजारी पडणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बदल्यात वातावणात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नाशिककरांसमोर निर्माण झाले आहे. श्रावण महिन्यात सतत ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. मात्र या ऊन पावसाचे आरोग्यावर परिणाम होत असल्याने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काल दुपारनंतर झालेल्या पावसानंतर शहरातील काही भागात विजेचा लंपडाव सुरू होता. तर अनेक भागात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण जात होते. येत्या काही दिवस शहरात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या चात ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

1 day ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

1 day ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 day ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 day ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 day ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 day ago