मुंबई : प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागा (आयएमडी)च्या ताज्या माहितीनुसार, यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास 19 सप्टेंबरपासून राजस्थानमधून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, देशातून मान्सून जरी मागे फिरत असला तरी महाराष्ट्रात परतीचा पाऊस पूर्णपणे थांबण्यापूर्वी 21 ते 28 सप्टेंबरदरम्यान राज्यभरात अतिशय दमदार आणि मुसळधार पुनरागमन करणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण होणार्या नवीन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पावसाचा मोठा जोर पाहायला मिळणार आहे.
वादळी वारे आणि विजांचा कडकडाट
♦ 20 ते 22 सप्टेंबर : उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस हा नेहमीच विजांच्या तीव्र कडकडाटासह येतो. त्यामुळे दुपारनंतर शेतात किंवा मोकळ्या मैदानात काम करताना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
♦ 21 ते 28 सप्टेंबर : सलग सात दिवस मुसळधार अंदाज
♦ 21 आणि 22 सप्टेंबर : नाशिक, पुणे घाटमाथा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्र परिसरात अनेक भागांत वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडेल.
♦ 22 आणि 23 सप्टेंबर : छत्रपती संभाजीनगर,जालना या मराठवाड्याच्या भागात आणि संपूर्ण विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी राहील. गेल्या काही दिवसांपासून या भागात असलेल्या पावसाच्या उघडिपेनंतर हा टप्पा पिकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. कोकण आणि मुंबई : संपूर्ण किनारपट्टीच्या भागात या आठवड्यात सर्वाधिक पावसाचा जोर राहील.
Possibility of heavy rain in the state over the next week.