शाळेसाठी विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

सुरगाणा  प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील आजही अनेक भागात नदीवर पुलंचं नसल्याने नागरिकांना पुरात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
एकीकडे सुरगाणा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली. पहिल्याच पावसात रस्ते खचले, पूल पाण्याखाली गेली, अनेक गावांचा संपर्क तुटला,  यामुळे अनके भागात आजही पुरपरिस्थिती असून नागरिकांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी केटीवेअर प्रवास करावा लागत आहे.सध्या या केटीवरून पुराचे पाणी जात असताना अशा प्रकारचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
सुरगाणा तालुका निसर्ग सौंर्दयाने बहरून गेलेला परिसर. मात्र या निसर्ग सौंदर्यामागे येथील नागरिकांच्या पायाभूत सुविधा कुठेच दिसत नाही. आजही रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधांची या ठिकाणी वाणवा आहे. म्हणजे अनेकदा रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका तर नाहीच नाही मात्र रस्ते नसल्याने डोली करून दवाखान्यात न्यावे लागते. पावसाळयात रस्ते नसल्याने पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. तर कधी रस्ते खचल्याने संपर्कच तुटतो. यंदाच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटनेस समोर आल्या. यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुढे आला. एकूणच तालुक्यातील पायाभूत सुविधांची परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.
दरम्यान सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा परिसरात नागरिकांसह विद्यार्थ्यांना केटीवरून ये जा करावी लागत आहे. या ठिकाणी कळमणे, भेगू, सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी अशी गावे असून यांचा इतर गावांशी सपंर्क तुटला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जा ये करण्यासाठी पूल होणे आवश्यक आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधण्यात यावा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाला कधी येणार जाग ?
यंदाच्या पावसाळ्यात सुरगाणा तालुक्यातील अत्यंत भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेक भागात पूर आल्याने संपर्क तुटला, आरोग्य व्यवस्था खोळंबली. पिण्याचे पाण्याची तीन तेरा वाजले. आता शाळा सुरु झाली तर विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी पुलंचं नाही. जीवघेणी कसरत करून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांसह नागरिकांवर आली आहे. त्यामुळे संबंधित तालुका, जिल्हा प्रशासन पायाभूत सुविधांसाठी नेमकं काय करतंय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. शिवाय अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्याशिवाय स्थानिक पातळीवर कामे करतात का? असाही प्रश्न या निमित्ताने होतो आहे.
Bhagwat Udavant

Recent Posts

ओव्हरलोड ट्रक रस्त्याखाली उतरला अन पुढे असे काही घडले….

मनमाड जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार बघा व्हिडिओ मनमाड: प्रतिनिधी मनमाड जवळ पुणे-इंदौर…

15 hours ago

फेसबुकवर मैत्री: मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर

फेसबुकवर मैत्री मित्राची गाडी थेट ओएलएक्सवर फेसबुक ओळखीचा गैरफायदा घेऊन गाडी विक्रीचा प्रयत्न शहापूर: साजिद…

20 hours ago

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोक्सो गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोक्सो गुन्ह्यातील आरोपी फरार ,अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर चौकीतील घटना…

1 day ago

सातपूरला ऑडीला अचानक आग

पपया नर्सरी येथे ऑडी गाडीला आग; पुढील भाग जळून खाक सिडको विशेष प्रतिनिधी :-सातपुर परिसरातील…

1 day ago

खोडाळ्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

खोडाळ्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा. मोखाडा : नामदेव ठोमरे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी…

1 day ago

दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी

दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी दिंडोरी ग्रामस्थांचा  नाशिक कळवण मार्गावर रास्ता रोको दिंडोरी :…

2 days ago