रबने बना दी जोडी!

पाटणा: लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात अस बोललं जात. बिहारमधील एका लग्नाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या लग्नासाठी न बोलवताही हजारो जण आले होते. या लग्नातील पती हा 36 इंच उंचीचा आहे, तर पत्नी ही 34 इंचाची आहे. त्यामुळे या लग्नाची चर्चा सुरु आहे.
वधू आणि वर बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. 24 वर्षीय वधू ममता नवगछिया येथील आहेत. तर वर मसारु येथील मुन्ना भारती (वय 26) आहेत. या लग्नाची चर्चा होण्याचे कारण आहे, या वधू आणि वराची उंची. 36 इंच उंची असलेल्या मुन्ना याला त्याची आयुष्याची साथीदार मिळाली आहे. 34 इंच उंची असलेल्या ममतासोबत मुन्नाचे लग्न झाले आहे. या लग्नाला अनेकांनी उपस्थिती लावत, त्यांच्यासोबत फोटो काढले आहेत.
या लग्नावेळी डीजेवर ’रब ने बना दी जोडी’ हे गाणे वाजत होते आणि लोक त्यावर नाचत होते. या लग्नाला हजारो लोक उपस्थित होते. हे लग्न बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. या लग्नाला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून या वधू वरांसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी या फोटोंना कमेंट केल्या आहेत. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात अशा कमेंट केल्या जात आहेत. एवढी कमी उंची असूनही मुन्नाला त्याच्या आयुष्याची जोडीदार मिळाली आहे. त्याची कमी उंची असूनही त्याचे लग्न झाले आहे. त्याला त्याच्याच उंचीएढी बायको मिळाली आहे. यामुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago