पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने सुरू असला तरी ते दोन – तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होतील , असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे . मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाच्या या काळामध्ये सोमवारपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जना अणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे .
हेही वाचा : दिलासादायक:कोकण, मराठवाड्यात आनंदघन बसणार
मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून आगेकूच केली . या वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून , लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे . श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारतभूमीच्या जवळ पोहोचले आहेत . मात्र , शनिवारी ( २८ मे ) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही .
हेही वाचा : आज मान्सून अंदमानात दाखल
बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांची प्रगती थांबली आहे . या वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून , ते पुढील काही तासांमध्ये पुन्हा प्रगती करतील आणि दोन – तीन दिवसांत केरळमधून भारतात प्रवेशतील , असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे .
नाशिक: प्रतिनिधी गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टिपथात आल्या असून, नगर…
ठेकेदाराकडून अटींचे उल्लंघन, ‘महसूल’चा कानाडोळा नाशिकरोड : प्रतिनिधी नाशिक तालुक्यातील जाखोरी गावालगत असणार्या दारणा नदीपात्रात…
पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण सिन्नर : प्रतिनिधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020…
राज्य उत्पादन शुल्क, दिंडोरी पोलिसांकडे दारूबंदीची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील वणी खुर्द येथे नऊ…
जलवाहिनीतील गळती काढली; विजेचाही प्रश्न मार्गी सिन्नर ः प्रतिनिधी कडवा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची शिवडे बंधार्यातील…
सिन्नर ः प्रतिनिधी तालुक्यातील पांगरी येथे सिन्नर-शिर्डी महामार्गावर पालखी रोडने जाणार्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने…