पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने सुरू असला तरी ते दोन – तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होतील , असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे . मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाच्या या काळामध्ये सोमवारपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जना अणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे .
हेही वाचा : दिलासादायक:कोकण, मराठवाड्यात आनंदघन बसणार
मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून आगेकूच केली . या वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून , लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे . श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारतभूमीच्या जवळ पोहोचले आहेत . मात्र , शनिवारी ( २८ मे ) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही .
हेही वाचा : आज मान्सून अंदमानात दाखल
बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांची प्रगती थांबली आहे . या वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून , ते पुढील काही तासांमध्ये पुन्हा प्रगती करतील आणि दोन – तीन दिवसांत केरळमधून भारतात प्रवेशतील , असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे .
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…