पाचोरे बुद्रुक : बाळासाहेब उगले
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकरी असलेल्या व कोणत्याही व्यवसायातून शासनाला आयकर भरत नसलेल्या शेतकऱ्यांना वर्षास बारा हजार देण्यासाठी शेतकरी सन्मान योजनेद्वारे तिमाही हप्त्यात बँक खात्यात पैसे पाठविण्यास सुरुवात केली असली तरी वृद्ध शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे . केंद्राने मोठा गाजावाजा करत शेतकरी सन्मान योजनेद्वारे तिमाही हप्त्यात दरमहा दोन हजार रुपये देण्यात येईल , असे जाहीर केले होते . त्याप्रमाणे पैसे खात्यावर देण्यास सुरुवात केली .
हेही वाचा : लासलगाव बाह्य वळण रस्ता नवीन सीमांकनामुळे शेतकरी संतप्त
मात्र , आता दर वर्षी या योजनेचे खाते अपडेट न केल्यास या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचा फतवा काढल्याने ज्यांचे खाते अपडेट होईल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे . मात्र , ज्या वयस्कर शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाइल नंबरला लिंक केले नाही व त्यांच्या हाताचे ठसेही मोबाइल नंबर लिंक करायला संबंधित यंत्रणेवर उमटत नाही ते मात्र यापुढे शेतकरी सन्मानपासून दूर राहून लाभापासून वंचित राहतील असे जाणकारांचे मत आहे .
मोठ्या शहरात वयस्कर लोकांच्या हाताचे ठसे काम करत नसल्यास त्यांच्या डोळ्याची फिंगर फोटोग्राफ घेऊन ओळख पटविण्यासाठी उपयोग होतो . मात्र , ग्रामीण भागात अजूनही सदरची सुविधा नसल्याने वयस्कर शेतकरी सन्मान योजनेपासून दूर राहतील , याबाबत जिल्हाधिकारी नाशिक यांनी लक्ष घालून वयस्कर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा , अशी मागणी जोर धरत आहे.
आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…