पुणे : प्रतिनिधी
राज्यातील शाळा येत्या 16 जूनपासून सुरू होणार आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरणार आहेत.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्त्वााचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी 7 ऐवजी 9 वाजता भरतील आणि दुपारी 4 वाजता सुटतील. म्हणजेच सकाळी 9 ते दुपारी 4 ही शाळेची वेळ असणार आहे. शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार, सकाळी 9 वाजल्यापासून ते 9.25 पर्यंत परिपाठ राहील. 9.25 ते 11.24 पर्यंत सुरुवातीचे तीन तास होतील. 11.25 पासून ते 11.35 पर्यंत 10 मिनिटांची छोटी सुट्टी असेल. 11.35 ते 12.50 पर्यंत दोन तास होतील. 12.50 ते 1.30 वाजेपर्यंत मधली सुट्टी होईल. त्यानंतर 1.30 ते 3.55 वाजेपर्यंत उर्वरित तास होतील. त्यानंतर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वंदे मारतम होईल आणि शाळा सुटतील.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची शाळा 9 जूनपासून सुरू झाल्या आहेत. राज्यातील 11 जिल्हे वगळता सगळीकडे शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात.
सिडको विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील उद्योगनगरी नाशिक येथे १४ जून २०२५ रोजी ऑटोमेशन रोड शो या…
वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा, कष्टकरीसाठी काम करण्याच्या सूचना नाशिक : प्रतिनिधी राज्यात वंचित बहुजन…
मंत्रालयासह अनेक शासकीय ठिकाणी कंत्राटी भरतीला प्राधान्य देणार्या राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचे…
मुंबई : उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या काही दिवस…
2017 च्या गट व गण रचनेप्रमाणे 2025 ची निवडणूक होणार नाशिक : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य…
चार पाण्याचे टँकर आणि डॉक्टरांसह रुग्णवाहिका नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा केंद्रबिंदू असलेल्या संतश्रेष्ठ…