सिन्नर : प्रतिनिधी
मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याचा राग आल्याने वरद प्रितम भालके (15) या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर येथे घडली. दहावीत गेलेल्या या विद्यार्थ्यांने राग अनावर झाल्याने हे कृत्य केल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सिन्नरमधील देवी रोड परिसरातील राम नगरीतील अमित सुरेश गजेकर (43) यांचा भाचा वरद (15) याच्या मित्राचा शनिवारी वाढदिवस होता. यासाठी जाण्याची त्याने तयारी केली. मात्र, घरच्यांनी वाढदिवस कार्यक्रमाला जाण्यास विरोध केला. त्यामुळे तो आतल्या खोलीत जाऊन बसला. याच दरम्यान कुटुंबातील सदस्य टीव्ही बघत होते. बराच वेळ होऊनही वरद बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता वरदने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चेतन मोरे तपास करत आहे.
सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…