महाराष्ट्र

सुरई… कां सुरमई…

सुरई… कां सुरमई…”

………

“ए “
…..

“बोल ना ‘

“आज तुझंच ऐकावं वाटतंय”

“कसं काय बाबा एकदम’
” हो ना “
” कोयलसी तेरी बोली’
“अरे.. बापरे “
“हो ना… पण कोयल सारखंच बोल”
” लगेच सामानाची यादी, पोरांचे गाऱ्हाणे, शाळेचे प्रॉब्लेम नको सांगुस यार “
” पण. कसं हे असं”
वाटतंय आता.. तर वाटू दे की रे..”.
“चांगलंच आहे म्हणा”
‘पण असं बोल म्हणलं की कसं सुचेल ग रोमँटिक’
“तू….
मला एकदा काय म्हणलं होतंस आठवतंय”
” सांग ना “
“तुम्ही मारू आहात”
“हो?’
“हो..’
” मला मारुचा अर्थ माहित नव्हता”
” मग, “
” विचारणार कोणाला ना मग “
“मी तुझ्याच दीदीला विचारलं होतं.’
“कप्पाळ माझं”
” हो ना “
“मग,”
“दीदी म्हणाली,तुला कोण म्हणलं”
“मग, सांगितलंस माझं नावं’
“नाही इतकी मी हुशार आहे’
“मग सांग पटकन’
” राजाच नावं सांगितलं होतं”
‘”दीदीने राजाला धुतला चांगलं”
आणि हळूच दीदी म्हणाली होती…
” तू ज्या साडीत मारू दिसतेस असं तुला राजा म्हणाला ना ती साडी, तो सेट मला देतेस एक दिवस… घालायला….”
” मग,, “
“मग काय मी दिला दीदीला
किती गोड दिसतं होती दीदी त्या साडीत”
“हं . मग पुढे “
…..
” अरे आपण आपलं रोमँटिक बोलतोय ना.. मग दीदी कुठून आली…. मधेच “
” अरे…. दुसऱ्यांदा सुद्धा.. तसंच झालं”
“हं … बोल”
” तूला ते गाणं आठवत कां……गुन गुना रहे हैं भवरे खील रही हैं कली कली”
“हो… आराधना…..”
“हो “
” त्याचं काय “
” त्यांत शर्मिलाने घातले…तसें मी कानातले घातले होते आणि गच्चीवर तुला भेटायला आले… “
” बरं मग…”
” बरं मग नाही…. तू म्हणालास…
चिकनी दिसतियेस.. “
” मग दिसतस होतीस..तशी”
“अरे, पण मला अर्थ माहित नाही ना. मला वाटलं चिकन म्हणजे कोंबडी आणि चिकणी म्हणजे त्यांची मुलं….”
“कप्पाळ माझं…”
“पुन्हा प्रश्न… कुणाला विचारायचं”
” मग “
” नाही कुणालाच नाही विचारला”
“काही दिवसांनी अशोक सराफ रंजनाला म्हणतो… काय चिकनी दिसतेस…”
“मग “
“खुद्कन हसू आलं मग “
माठ होते रे मी अगदी “
“अजूनही आहेस…. परवा गच्चीवर चल खुणावले… तर म्हणालीस… मगाशीच आणलेत कपडे घड्या पण करून ठेवल्या त…”
“ती वहिनी म्हणाली म्हणून उठलीस तू… अगो उषा, पापड वाळले असतील ग “
“खरंच… माठ… अगदी माठ.. होते “
“माठ नाही…. सुरई…ती देखील मद्याने भरलेली “
……..
“आगोबाई….. हो कां..
………..
……आता मात्र अतीच झालं हो…
जा बरं… गुपचूप पडा आपल्या खोलीत जाऊन..”
……
” हो, आणि सगळं आवरणं झालं की ये तू भरून, काठोकाठ, सुरई…..”
” येतेस ना”
” आता…जाता गुपचूप की कसं…… “
आणि ती खुदुखुदू हसू लागली…
………
©विशाखा

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

5 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago