दहावी , बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागणारमुंबई : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून , आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे . १० जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून , दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल , अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे . शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती . परंतु , जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे . शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे . यावेळी बारावीचा पेपर १५ दिवस उशिरा सुरू झाला . त्यामुळे आम्ही १० जूनपर्यंत निकाल जाहीर करू , असे बोर्डाने म्हटले . त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे .
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…