दहावी , बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागणारमुंबई : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून , आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे . १० जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून , दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल , अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे . शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती . परंतु , जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे . शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे . यावेळी बारावीचा पेपर १५ दिवस उशिरा सुरू झाला . त्यामुळे आम्ही १० जूनपर्यंत निकाल जाहीर करू , असे बोर्डाने म्हटले . त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे .
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…