दहावी , बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागणारमुंबई : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून , आता दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे . १० जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून , दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल , अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे . शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सतावत होती . परंतु , जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे . शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे . यावेळी बारावीचा पेपर १५ दिवस उशिरा सुरू झाला . त्यामुळे आम्ही १० जूनपर्यंत निकाल जाहीर करू , असे बोर्डाने म्हटले . त्यानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे .
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…