नाशिक

त्र्यंबकला मर्कटलीलां मुळे नागरिक हैराण

त्र्यंबकेश्वर:प्रतिनिधी

शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून मर्कटलीलांनी त्रस्त झाले आहेत . ब्रह्मगिरी , गंगाद्वार येथे मोठ्या प्रमाणात वानरांनी उच्छाद मांडला आहे . सात – आठ अशा संख्येने असलेल्या माकडांनी शहरात उच्छाद मांडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत . ब्रह्मगिरी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड झाली आहे . जमीन सपाटीकरणाच्या नावाने झालेली तोडफोडमुळे माकडांचा नैसर्गिक अधिवास हिरावला गेला आहे . खाण्याचे आणि पाण्याचे वांधे झाल्याने माकडांनी शहराकडे मोर्चा वळवला आहे . दिवसभर घरांच्या छपरावरून तसेच बाल्कनीमधून उड्या मारत शहराच्या या टोकाच्या त्या टोकाला फिरत असतात . उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ , महिला वाळवणाचे पदार्थ करत आहेत . माकडांची टोळी आल्यास वडे , पापड या वाळवणाच्या पदार्थांवर ताव मारतात . महिलांची हे पदार्थ उचलण्यासाठी धावपळ होत असते . काही घरांच्या गच्चीत असलेल्या पाण्याच्या टाक्या देखील माकडांनी लक्ष्य केल्या आहेत . त्यांचे झाकण काढून आत ठोकणे अथवा सरळ व्हॉल्व्ह सोडून देतात . त्यामुळे परिसरात पाणीच पाणी होत असते . पुरोहितांच्या घरात शिरून पूजासाहित्याची नासधूस केली जात आहे . कुशावर्तावर देखील मांडलेली पूजा विस्कटून टाकण्याचे प्रकार घडत आहेत . शहरातील केवल प्रसारण विस्कळीत झाले आहे . केबलला लटकत कसरती करत असल्याने असे प्रसंग ओढावत आहेत . केबलचालक देखील दुरुस्ती करून वैतागले आहेत . काही भाविकांना चावा घेतल्याचे तसेच जवळचे खाद्यपदार्थ हिसकावून घेतल्याच्या घटना वारंवार घडत आहेत . याबाबत वनखात्यास वेळोवेळी कळविले असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत .

 

नागरिकांनी माहिती देताच रेस्कू टीम पाठविण्यात येते . मात्र , माकडांनी तोपर्यंत आपली जागा बदललेली असते . त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचण येत आहे

. -राजेश पवार , वनपरिक्षेत्र अधिकारी , त्र्यंबकेश्वर

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

17 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

17 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

17 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

18 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

18 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

18 hours ago