नाशिक

त्र्यंबकला मर्कटलीलां मुळे नागरिक हैराण

त्र्यंबकेश्वर:प्रतिनिधी

शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून मर्कटलीलांनी त्रस्त झाले आहेत . ब्रह्मगिरी , गंगाद्वार येथे मोठ्या प्रमाणात वानरांनी उच्छाद मांडला आहे . सात – आठ अशा संख्येने असलेल्या माकडांनी शहरात उच्छाद मांडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत . ब्रह्मगिरी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड झाली आहे . जमीन सपाटीकरणाच्या नावाने झालेली तोडफोडमुळे माकडांचा नैसर्गिक अधिवास हिरावला गेला आहे . खाण्याचे आणि पाण्याचे वांधे झाल्याने माकडांनी शहराकडे मोर्चा वळवला आहे . दिवसभर घरांच्या छपरावरून तसेच बाल्कनीमधून उड्या मारत शहराच्या या टोकाच्या त्या टोकाला फिरत असतात . उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ , महिला वाळवणाचे पदार्थ करत आहेत . माकडांची टोळी आल्यास वडे , पापड या वाळवणाच्या पदार्थांवर ताव मारतात . महिलांची हे पदार्थ उचलण्यासाठी धावपळ होत असते . काही घरांच्या गच्चीत असलेल्या पाण्याच्या टाक्या देखील माकडांनी लक्ष्य केल्या आहेत . त्यांचे झाकण काढून आत ठोकणे अथवा सरळ व्हॉल्व्ह सोडून देतात . त्यामुळे परिसरात पाणीच पाणी होत असते . पुरोहितांच्या घरात शिरून पूजासाहित्याची नासधूस केली जात आहे . कुशावर्तावर देखील मांडलेली पूजा विस्कटून टाकण्याचे प्रकार घडत आहेत . शहरातील केवल प्रसारण विस्कळीत झाले आहे . केबलला लटकत कसरती करत असल्याने असे प्रसंग ओढावत आहेत . केबलचालक देखील दुरुस्ती करून वैतागले आहेत . काही भाविकांना चावा घेतल्याचे तसेच जवळचे खाद्यपदार्थ हिसकावून घेतल्याच्या घटना वारंवार घडत आहेत . याबाबत वनखात्यास वेळोवेळी कळविले असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत .

 

नागरिकांनी माहिती देताच रेस्कू टीम पाठविण्यात येते . मात्र , माकडांनी तोपर्यंत आपली जागा बदललेली असते . त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचण येत आहे

. -राजेश पवार , वनपरिक्षेत्र अधिकारी , त्र्यंबकेश्वर

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago