पालक सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाने अलीकडेच दिलेला 100 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. ई ऑफिस प्रणालीचा वापर करावा, अशा सूचना पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काल सकाळी राज्य शासनाने दिलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाचा पालक सचिव श्री. डवले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालक सचिव डवले यांनी सांगितले की, शासनाच्या शंभर दिवसांच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी भविष्यातील वाटचालीसाठी विकसित महाराष्ट्र 2047 च्या अनुषंगाने व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यात दीर्घकालीन म्हणजे 2047 पर्यंत गाठावयाची उद्दिष्टे, मध्यमकालीन उद्दिष्टे म्हणजे राज्याच्या अमृत महोत्सवापर्यंत गाठावयाची उद्दिष्टे आणि अल्पकालीन म्हणजे 2 ऑक्टोबर 2029 पर्यंतच्या पाच वर्षांत वर्षनिहाय गाठावयाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे. दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात विकसित महाराष्ट्र 2047, ई गव्हर्नन्स, सेवाविषयक, प्रशासकीय सुधारणांचाही समावेश आहे. तसेच तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. आगामी काळात शंभर टक्के ई-ऑफिस प्रणालीचा वापर करावा, असेही पालक सचिव श्री. डवले यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी 150 दिवसांनिमित जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
या बैठकीनंतर पालक सचिव श्री. डवले यांनी नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणार्या आगामी कुंभमेळ्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत त्यांना गती देण्याचे निर्देश दिले. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहअध्यक्ष श्रीमती नायर यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
कॉलेजच्या रंगीत दिवसांची स्टाइल डायरी तरुणींनी कॉलेज कॅम्पसचा लूक सहज, स्टायलिश आणि व्यक्तिमत्त्वसंपन्न ठेवायचा असेल,…
पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो. कुणाला तो बालपणात घेऊन जातो, कुणाला कॉलेजवयीन…
ष्टीच्या आरंभापासूनच मानवाच्या कल्पनाशक्तीला गोंधळात टाकणारे, विस्मयकारी आणि अनंत अशा अंतराळाचे गूढ अजूनही वैज्ञानिकांच्या अभ्यासाचा…
निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे,…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी संततधारेमुळे नाशिकरोड व परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. पाच ते सहा…
एअरपोर्ट शैलीतील आसनव्यवस्था; प्रतीक्षालयाला नवे रूप नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी भुसावळ विभाग, मध्य रेल्वे यांनी…