नाशिक

नुकसानभरपाईस एक कोटी रुपये लागणार

कळवण तालुक्यात अवकाळीच्या पंचनाम्यांचा अहवाल शासनदरबारी सादर

कळवण : प्रतिनिधी
वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कळवण तालुक्यांमधील 92 गावांमधील 946 शेतकर्‍यांच्या 378.25 हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. आमदार नितीन पवार यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशांनुसार महसूल, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शासनस्तरावर 1 कोटी 2 लाख 11 हजार 410 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनस्तरावर सादर केला आहे.
एप्रिलपाठोपाठ मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा शेतकर्‍यांना बसला. 6 ते 14 मेदरम्यान तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात दाणादाण
उडाली.
काठरे दिगर, सुपले दिगर, खर्डेदिगर, पुनंदनगर, शिरसमणी, एकलहरे, नाकोडे, बेज, कोसवण, खिराड, मोहपाडा, तिन्हळ खुर्द, सरलेदिगर, मळगाव खुर्द, पिंपळे बु., दरेभणगी, भैताणेदिगर, कोसुर्डे, जामले हतगड, चाफापाडा येथील घरांचे पत्रे, कांदा चाळीचे पत्रे, भिंत पडून घराचे तसेच बैलगोठा, हॉटेल व घरांचे 98 ठिकाणी नुकसान झाले होते.
महसूल, कृषी विभागाच्या संयुक्त अहवालनुसार फळपिके सोडून कोरडवाहू जिराईत पिकाखालील 33 टक्क्यांवरील एका शेतकर्‍याचे 0.10 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून, 1360 रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित आहे. फळपिके सोडून बागायत वार्षिक फळपिकाखालील 91 गावे बाधित झाले असून, 945 शेतकर्‍यांचे 378.15 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्यात कांदा 326.50 हेक्टर, गहू 0.50 हेक्टर, 23.45 हेक्टर बाजरी, 4.80 हेक्टर मिरची, 9.10 हेक्टर टोमॅटो, मका 0.20 हेक्टर, भाजीपाला 13.60 हेक्टर नुकसान झाले.

कांद्याचे 326 हेक्टर क्षेत्रात नुकसान
अवकाळी पावसामुळे सुमारे 378 हेक्टरवरील उभे पीक, भाजीपाला, आंबा, फळबागा आणि काढणी करून ठेवलेला कांदा, मका यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. यात उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र 28 हजार 716 हेक्टर कांद्याचे क्षेत्र असून, त्यात 326.50 हेक्टर क्षेत्रावरील शेतकरीवर्गाचे नुकसान झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवण दौर्‍यात नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकार्‍यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनस्तरावर पाठविण्याच्या सूचना केल्याने अहवाल सादर झाला आहे.
– नितीन पवार, आमदार, कळवण

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 92 गावांतील 378.25 हेक्टर क्षेत्र बाधित होऊन 946 शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. 98 ठिकाणी घर व कांदा चाळीचे नुकसान झाले आहे. मदतीसाठी नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.
– रोहिदास वारुळे, तहसीलदार, कळवण

Gavkari Admin

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

7 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

7 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

8 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

8 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

8 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

8 hours ago