पाणी कपातीचा निर्णय पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता

नाशिक : प्रतिनिधी
यंदाच्या हंगामात मान्सूनला नेहमीच्या तुलनेत एक महिना विलंब होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.महापालिकेला उपलब्ध पाणी ३१ जुलैऐवजी आॅगस्टअखेरपर्यंत पुरविण्याचे नियोजन करावे लागत आहे. दरम्यान पाणी कपातीचा निर्णय मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असण्याची शक्यता आहे.
नाशिककरांची तहान भागवायची असल्यास पाणी कपात अटळ मानली जात आहे. मनपा प्रशासनाकडून चालू एप्रिलमध्ये याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. आठवड्यातून एकदा पूर्ण दिवस पाणी कपात असे नियोजन होते. पण राजकीय विरोधापोटी याबाबत निर्णय होऊ शकला नाही. मात्र आता देखील कपातीचा निर्णय पुढे ढकलल्यास  मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास शहरात पाणीबाणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत फैसला होणार आहे. आयुक्त सहा मे पासून एक महिन्यासाठी प्रशिक्षणासाठी मसुरिला जात आहे. त्यापुर्वी बैठक घेत ते पाणी कपातीचा निर्णय घेणार आहे. मिळालेल्या माहितीनूसार आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र राजकीय दबावामुळे पाणी कपातीच्या निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही.
Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

8 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

9 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

9 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

9 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

9 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

9 hours ago