format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 13107200;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 281.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 31;
नालेसफाईचे पितळ उघडे; सखल भागांत पाणीच पाणी
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने शहरात मुक्काम ठोकून झोडपून काढले आहे. राज्यात यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन झाले. बुधवारी (दि.28) मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने नाशिकमध्ये दमदार हजेरी लावत एक तास जोरात बॅटिंग केली. दरम्यान, महापालिकेच्या अपुर्या नालेसफाईचा फटका पुन्हा एकदा शहरवासीयांना बसला. अनेक ठिकाणी चेंबर्समधून पाण्याचा निचरा होत नसल्याने ते ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवरून वाहन होते. पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने सखल भागांत पाणी साचल्याने त्यास तळ्याचे स्वरूप आले. सराफ बाजार, दहीपूल, मेन रोड परिसरातील व्यावसायिकांची कमालीची धांदळ उडाली.
शहरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचत असून, वाहतूकही विस्कळीत होत आहे. बुधवारी (दि. 28) उपनगरांसह मध्यवर्ती भागात पावसाची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. पावसामुळे शहरातील महापालिकेच्या नियोजन आणि व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. बुधवारी अनेक ठिकाणी पाणी साचले, रस्ते जलमय झाले आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या पावसाने महापालिकेच्या तयारीची पोलखोल झाली आहे. नालेफाई आणि इतर उपाययोजना व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. विशेषत: काही ठिकाणी नालेसफाई करूनही त्या भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. महापालिकेने नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आणि पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन योजना तयार करणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत पावसामुळे नागरिकांची सोय आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने महापालिकेने उपाययोजना करण्याची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापन अहवाल सादर केला असला, तरी त्यानुसार काम होणे आवश्यक आहे.
दरम्यान, पावसामुळे नाशिक शहरातील महापालिकेच्या नियोजन व व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत.
पावसाचे पाणी रिक्षात येत असल्याने त्यापासून बचावासाठी प्रवाशाला अशा प्रकारे छत्री उघडून बसावे लागले.
वीजपुरवठा खंडित
मे महिन्यात नागरिकांना शेकडो वेळा वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे.
त्यातच बुधवारीदेखील सकाळी अकराच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सीबीएस,
रेड क्रॉस सिंग्नल, नाशिकरोड, पंचवटी, म्हसरूळ आदींसह काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याचे
नागरिकांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
मनपा आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असताना अतिरिक्त
आयुक्त करिष्मा नायर यांनी काही दिवसांपूर्वी पावसाच्या
पाण्यामुळे पाणी साचलेल्या भागांत जाऊन पाहणी केली होती.
त्यावेळी त्यांनी पाणी साचणार नाही, तसेच ब्लॅक स्पॉटवर काम
करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले होते. मात्र, तरीही
शहरातील अनेक भागांत पाणी साचतच असल्याचे चित्र आहे.
पन्नास किलोमीटर नाल्यांची सफाई
शहरात एकूण 121 किलोमीटर नाल्यांची सफाई मोहीम बांधकाम
विभागाने हाती घेतली आहे. आतापर्यंत 50 किलोमीटर नाल्यांची
सफाई झाली आहे. शहरात तीन लाख 69 हजार मीटर लांबीचे पाइप
असून, त्यावर 13 हजार 946 चेंबर आहेत. नाल्यांच्या सफाईसह
चेंबरच्या कामासाठी यंदा निविदा न काढता त्या-त्या विभागातील कामे
ठेकेदारांकडून सुरू केली आहेत. यासाठी प्रत्येक प्रभागासाठी पन्नास
लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
आरोग्यासाठी अन्न किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते.…
पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना असह्य उकाड्यातून थोडातरी दिलासा मिळाला आहे. पावसाळा आला…
आम्हाला गर्भसंस्कार करायचं आहे, अशी इच्छा घेऊन अनेक गर्भिणी रुग्ण क्लिनिकला येतात. पण मुळात गर्भसंस्कार…
दहा ते पंधरा मोटारसायकलचे नुकसान उमराळे बुद्रुक ः प्रतिनिधी गुजरातला जोडणार्या नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावर नाशिककडून…
स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिसांची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या वाहतूक…
सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक-मुंबई महामार्गावरील लेखानगर परिसरातील उड्डाणपुलावर बुधवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास गंभीर…