प्रशासनाला उपरती, स्वच्छतेसाठी 80 कर्मचार्यांंचा ठेका
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरीसह उपनद्यांमधील प्रदूषणामुळे नाशिक महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याची कबुली स्वतः प्रशासनाने देत, यावर उपाययोजनेकरिता 80 कर्मचार्यांची स्वच्छतेकरिता नियुक्ती केली जाणार आहे. मनपा हद्दीत गोदावरी नदीची लांबी 20.50 किलोमीटर, तर नंदिनीची लांबी 15 किलोमीटर आहे.
प्रशासनाने यासाठीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. दरम्यान, मनपा हद्दीतील गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या (वालदेवी, वाघाडी, कपिला, नंदिनी व इतर) 100 फूट दोन्ही तीरांवरील परिसर साफसफाई व स्वच्छ ठेवणे, तसेच नदीपात्रात वाढणार्या पाणवेली, पाणगवत, प्लास्टिक, केरकचरा साफसफाई करण्यासाठी 80 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार आता तरी महापालिका ठोस पावले उचलणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, मनपा हद्दीतील गोदावरी नदी व तिच्या उपनद्या स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मनपा हद्दीतील गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांच्या 100 फूट दोन्ही तीरांवरील परिसर साफसफाई ठेवण्यासह नदीपात्रात वाढणार्या पाणवेली, पाणगवत, प्लॉस्टिक, केरकचरा साफसफाई ठेवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वाढत्या प्रदूषणामुळे देश-परदेशातून येणार्या पर्यटकांसमोर नाशिक महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. गोदावरी नदीच्या उपनद्या वालदेवी, वाघाडी, कपिला व नंदिनी या नद्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती व झोपडपट्ट्या असल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांकडून घाण, कचरा व निर्माल्य टाकले जात असल्याने परिसरात डास, दुर्गंधी व रोगराई निर्माण होते. शहरातील गोदावरी नदी व लगतच्या ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी दररोज असंख्य भाविक पंचवटी परिसरात येतात. गोदावरी नदीलगतच्या परिसरातच निर्माल्य, तसेच इतर सामग्री टाकली जात असल्याने नद्यांचे प्रदूषण वाढत होत आहे. या नद्यांमधील स्वच्छतेसाठी यापूर्वी मान्यता देण्यात आलेले 60 व वाढीव 20 असे एकूण 80 अकुशल कर्मचार्यांचा सुधारित प्रस्ताव महासभेवर सादर केला आहे.
असे असेल नियोजन
गोदावरी मनुष्यबळ – 35
वालदेवी नदीसाठी – 06
नंदिनी नदी – 15
वाघाडी नदी – 08
कपिला नदी – 06
इतर उपनद्यांसाठी – 10
एकूण कर्मचारी – 80
The image of the Municipal Corporation is tarnished due to pollution in the Godavari River in the city.
संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी विरोधकांची एकजूट नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना…
नांदेडमध्ये 47, तर अकोल्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी देशातील हवामानात सध्या…
इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…