नाशिक : प्रतिनिधी
शहरातील तापमानात वाढ झाली असून, एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात तापमानाने चाळिशी गाठली आहे. पुढील चार-पाच दिवस उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककरांच्या जीवाची काहिली होणार आहे. त्यामुळे कामाशिवाय, तसेच उन्हाच्या वेळा सोडून सकाळी किंवा सायंकाळी बाहेर पडण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरात उष्णतेची लाट कायम असून, मंगळवारी, दि. 14 रोजी कमाल तापमान 39.3 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हवेतील आर्द्रता 54 टक्के राहिली आहे.दिवसेंदिवस तापमानात चढ-उतार होत असले, तरी उष्णतेची तीव्रता हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार आर्द्रता केवळ 23 टक्के इतकी राहिल्याने वातावरण कोरडे आणि उकाड्याचे जाणवत आहे. उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पर्याप्त पाणी पिणे, डोके झाकून बाहेर पडणे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रविवारी शहराचे तापमान 32.5 अंश सेल्सिअस, तर सोमवारी 38.8 अंशांवर पोहोचले. मंगळवारी, दि. 14 किमान तापमान सकाळी 20 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.दुपारी कमाल तापमान 39.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
तापमानाचा पारा चढल्याने नागरिक भरदुपारी घामाने डबडबल्याचे चित्र होते. परिणामी शीतपेये, सावलीचा आधार घेत गारवा अनुभवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढता राहणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
जिल्ह्यात उष्णतेचा प्रभाव कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे, असा सल्ला दिला आहे.
अशी घ्या खबरदारी
या काळात दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे, शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे, हलका व सैलसर पोशाख करावा, तसेच डोके झाकून बाहेर पडावे. उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
the-mercury-has-risen-citizens-are-sweating-profusely
नांदेडमध्ये 47, तर अकोल्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी देशातील हवामानात सध्या…
इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…
आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…