नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षात नेमके काय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच आज सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली,या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले.
16 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, या याचिकेची सूनवणी होण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती रमांनी यांच्या अध्यक्षतेखाली 3 जणांचे घटनापीठ नियुक्त करण्यात आले होते, या घटना पिठात आज सुनावणी झाली, शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली,
उपसभापती नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपत्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत, या दरम्यान राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, राज्यात स्थापन झालेले सरकारच बेकायदेशीर असल्याची एक अशा एकूण वेगवेगळ्या चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत या सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी झाली, शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टाकडे आठवडाभराची वेळ मागितली होती, यात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आता या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…