गुरुकृपा अडत्याने थकवले अडीच कोटी; पाच तास कांदा लिलाव बंद
पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुकृपा या अडतदाराकडे आठ ते नऊ महिन्यांपासून दिंडोरी, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकवले आहे. हे पैसे मिळावे, यासाठी तीन वेळा आंदोलन झाले. मात्र, शेतकर्यांना पैसे प्राप्त झाले नाही. बाजार समितीकडे अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांनी सोमवारी (दि.2) आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले.
जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतल्याने सुमारे पाच तास हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी शेतकर्यांशी संवाद साधत संबंधित अडतदाराच्या जमिनीचा व्यवहार झाला आहे. 17 जूनपर्यंत शेतकर्यांचे पैसे मिळतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मात्र, 17 तारखेला पैसे मिळाले नाही तर त्यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
पिंपळगाव बसवंतमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि कांद्याची आवक होत असते. व्यापार्यांनी टोमॅटोची खरेदी करूनदेखील पैसे दिले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या अंतर्गत व्यापार्यांनी टोमॅटोची खरेदी केली होती. मात्र, त्यांनी शेतकर्यांची तब्बल अडीच कोटी रुपयांची देणी थकवली आहे.
मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…
मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…
मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…
एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…
पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…
ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्यांना महापालिका निवडणुकीत…