गुरुकृपा अडत्याने थकवले अडीच कोटी; पाच तास कांदा लिलाव बंद
पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुकृपा या अडतदाराकडे आठ ते नऊ महिन्यांपासून दिंडोरी, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकवले आहे. हे पैसे मिळावे, यासाठी तीन वेळा आंदोलन झाले. मात्र, शेतकर्यांना पैसे प्राप्त झाले नाही. बाजार समितीकडे अनेकदा मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांनी सोमवारी (दि.2) आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले.
जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतल्याने सुमारे पाच तास हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी शेतकर्यांशी संवाद साधत संबंधित अडतदाराच्या जमिनीचा व्यवहार झाला आहे. 17 जूनपर्यंत शेतकर्यांचे पैसे मिळतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मात्र, 17 तारखेला पैसे मिळाले नाही तर त्यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.
पिंपळगाव बसवंतमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि कांद्याची आवक होत असते. व्यापार्यांनी टोमॅटोची खरेदी करूनदेखील पैसे दिले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या अंतर्गत व्यापार्यांनी टोमॅटोची खरेदी केली होती. मात्र, त्यांनी शेतकर्यांची तब्बल अडीच कोटी रुपयांची देणी थकवली आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…