ठाणगाव ः वार्ताहर
सिन्नर-ठाणगाव रोडवरील घोडेवाल्याचा मळा येथे गुरुवारी (दि.12) रात्री नऊ वाजता वादळी वार्यासह मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड उन्मळून पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
रात्री येणार्या-जाणार्यांना पर्यायी मार्ग नसल्याने डुबेरे येथे येऊन सोनारी, आडवाडीमार्गे ठाणगावमध्ये आले. दुसर्या दिवशी ठाणगाववरून जाणार्या सर्व मुक्कामी गाड्या ठाणगाव, कोकणवाडी, खिरविरा, आडवाडीमार्गे सिन्नरकडे मार्गस्थ झाल्या. औद्योगिक वसाहतींमध्ये कामाला जाणार्या कामगारांना सकाळी नऊ वाजेपर्यंत रस्त्यावर पडलेल्या बाभळीमुळे पुढे जाता येत नव्हते. अखेर स्थानिक नागरिकांनी कटर मशिन आणून झाड कट केले. वाहनधारकांनी त्यांना मदत केली व रस्ता मोकळा केला. तोपर्यंत सिन्नरून येणार्या गाड्या व ठाणगाव परिसरातून जाणार्या सर्व वाहनांच्या दोेन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हळूहळू रस्ता मोकळा होत गेला व तिथून पुढे वाहतूक सुरळीत झाली.
ठाणगाव-सिन्नर रोडवर असे अनेक धोकादायक झाडे आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात एका पिकअपवरही झाड कोसळले होते. संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेऊन रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे काढून टाकावीत, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, ठाणगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. रात्री आठ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी सात वाजताच सुरू होतो. त्याचा गंभीर परिणाम वीजग्राहकांबरोबरच पाचगाव पाणीपुरवठा योजनेवरसुद्धा झालेला आहे.
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…