महाराष्ट्र

ट्रॅव्हल्स कंपन्यांची वर्दी ; पर्यटकांची गर्दी!

नाशिक : प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या सुट्टयांमुळे प्रत्येक जण ट्रीपचा प्लॅन करत असतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे कुठेही जाता आले नाही. आता सर्व अनलॉक झाल्याने यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध ठिकाणी आपल्या बजेटनुसार फिरायला जाण्याचे प्लॅन आखले जात आहेत. हीच बाब लक्षात घेत ट्रॅव्हल्स कंपन्याही विविध ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. तसेच राज्य, आंतरराज्यीय आणि आंतराष्ट्रीय पर्यटनाचे प्लॅन केले जात आहे. बजेटनुसार विविध प्रकारच्या टूर पॅकेजला प्राधान्य दिले जात आहे.
मागील दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भावानंतर आता अनलॉक झाले असून, आता सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायांने अर्थिक नुकसान झाले तर अनेक व्यवसाय, उद्योग डबघाईला आले. मात्र सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायला बसला. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने पर्यटन व्यवसायाला पुन्हा चालना मिळत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या आधी ज्यांनी बुकींग केले होते. कोरोनामुळे निर्बंध आल्याने जाता आले नाही अशांना पर्यटकांना त्यावेळी असलेल्या दरात प्रवास करता येणार असल्याचे ट्रॅव्हल्स कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

प्रवास खर्च महागला
मागील दोन वर्षात झालेल्या इंधन दरवाढीमुळे कोरोनाच्या आधी असणार्या प्रवास बजेटमध्ये आता वाढ झाली आहे.त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लॅन करणार्‍यांना वाढलेल्या बजेटचा विचार करूनच प्लॅन करावा लागत आहे.

या प्रवाशांना प्रवास खर्चात सूट
कोरोना प्रादुर्भावाच्या आधी ज्यांनी बुकींग केले होते. मात्र कोरोनामुळे निर्बंध आल्याने जाता आले नाही अशा पर्यटकांना त्यावेळी असलेल्या दरात प्रवास करता येणार असल्याचे ट्रॅव्हल्स कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

काश्मीर, कोकणला सर्वाधिक पसंत
उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटकांची पसंती मिळत आहे. त्यात जम्मु काश्मीर, हिमाचल प्रदेश तर महाराष्ट्रातील कोकण दर्शन ट्रीपला पर्यटकांची पसंती मिळत आहे.

या स्थळांना पसंती
आष्टविनायक दर्शन
जम्मू – काश्मीर
वैष्णवी देवी
चारधाम
हिमाचल प्रदेश
चंदीगड
दिल्ली
काशी
डेहराडून
कुलू मनाली
महाबळेश्‍वर

कोरोनानंतर दोन वर्षांनी पर्यटन व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला आहे. पण कोरोनाच्या आधी ज्या प्रमाणात पर्यटकांचा उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रतिसाद मिळत होता.तसा प्रतिसाद अद्याप मिळत नाही.
रवींद्र बरडे ( चौधरी यात्रा कंपनी )

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

21 hours ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

21 hours ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

21 hours ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

24 hours ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

2 days ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

2 days ago