मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यू

मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यू

मनमाड : आमिन शेख

येथील चांदवड रोडवर दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सपडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मनमाड येथील चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडुन मनमाडकडे येत असताना रस्त्यात गायी अंगावर आल्याने त्यांना वाचवताना बॅलन्स जाऊन मोटारसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही चिरडले यात  मोटारसायकल वरील  आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.अपघात इतका भीषण होता की या दोन्ही मुलांचा अक्षरशः चुरा झाला यामुळे यांची ओळख पटने देखील शक्य नाही त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोकाट जनावरे आणि रोजची वाहतुक कोंडीमुळे अपघात

मनमाड शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरत आहेत याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या मात्र कोणीही याबाबत दखल घेत नाही याशिवाय चांदवड रोड मालेगाव रोड व येवला रोड या महामार्गावर मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते यामुळे देखील रोज अपघात होत असतात आजही मोकाट जनावरामुळे दोन शाळकरी मुलाचा जीव गेला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

6 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

15 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

18 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

2 days ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

2 days ago